Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांचा इरादा पक्का ; निवडणूक काळातही सुरूच राहणार आंदोलन

Lok Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच देशातील लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात आदर्श आचरसंहिता लागू झाली आहे.
Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांचा इरादा पक्का ; निवडणूक काळातही सुरूच राहणार आंदोलन
Published on
Updated on

Pune News : देशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी म्हटले आहे. शेतकरी आपल्या मागण्यांपासून तसूभरही मागे हटणार नाहीत. आचारसंहिता लागू झाली असली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यापासून रोखू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच देशातील लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात आदर्श आचरसंहिता लागू झाली आहे. निवडणुकांनंतर लवकरच नवीन सरकार स्थापन होईल. मात्र, या सगळ्यातही दिल्लीत सुरू असणाऱ्या आंदोलनावर शेतकरी ठाम आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकऱ्यांचा पवित्रा पाहता ते आंदोलनापासून मागे हटण्याच्या स्थितीत दिसत नाही.

Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांचा इरादा पक्का ; निवडणूक काळातही सुरूच राहणार आंदोलन
Delhi Farmers Protest : शेतकरी नेत्यांवर ‘एनएसए’ नाहीच

गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहे. हमीभाव कायद्याच्या मागणीसाठी पंजाब, हरियाणातील शेतकरी १३ फेब्रूवारीपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या तयारीत अलेल्या शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर लोखंडी खीळे ठोकून आणि बॅरिकेटींग करून तिथेच रोखण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापासून हे शेतकरी खनौरी आणि शंभू सीमेवर विरोध प्रदर्शन करत आहेत.

Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांचा इरादा पक्का ; निवडणूक काळातही सुरूच राहणार आंदोलन
Delhi Farmers' Protest : दिल्लीत शेतकऱ्यांची महापंचायत; पंजाबमधील शेतकरी ८०० हून अधिक बस, ट्रक आणि अनेक गाड्यांमधून दिल्लीच्या दिशेने

आंदोलनाला पाठिंबा

दरम्यान, देशात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शेतकरी आंदोलन मागे घेतील, असे म्हटले जात होते. मात्र, शेतकरी आंदोलनावर ठाम राहिल्याने नवीन येणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी अनेक शेतकरी संघटनांसोबत बैठक झाली. त्यानंतर आंदोनल सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे डल्लेवाल यांनी म्हटले आहे.

आरएसएसवर टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून पंजाबमध्ये फुटीरतावादी शक्तींना प्रोत्साहन दिले जात असल्याचा मोठा आरोप आरएसएसने केला आहे. त्याला उत्तर देताना डल्लेवाल यांनी म्हटले आहे की, हे समाजात फूट पाडण्यासारखे आहे. शेतकरी आपल्या मागण्या मांडत आहे जे रास्त आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com