Farmer Assistance: भुईमूग वाहून गेलेल्या शेतकऱ्याला प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षाच!

Government Compensation Update: बाजार समितीमधून पाण्याच्या प्रवाहासोबत भुईमूग शेंगा वाहून गेल्यानंतर मानोरा बाजार समितीच्या कारभाराविरोधात तीव्र असंतोष व्यक्‍त होत होता. या संदर्भातील वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर बारवा गावच्या या शेतकऱ्याप्रती अनेकांनी मदतीचा हातही पुढे केला.
Farmer Issue
Farmer IssueAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: बाजार समितीमधून पाण्याच्या प्रवाहासोबत भुईमूग शेंगा वाहून गेल्यानंतर मानोरा बाजार समितीच्या कारभाराविरोधात तीव्र असंतोष व्यक्‍त होत होता. या संदर्भातील वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर बारवा गावच्या या शेतकऱ्याप्रती अनेकांनी मदतीचा हातही पुढे केला. मात्र प्रशासनाकडून अद्यापही या शेतकऱ्याला मदतीची प्रतीक्षा आहे.

बारवा गावातील इंदल पवार यांची जेमतेम पाच एकर जमीन आहे. यातून कुटुंबाच्या गरजांची पूर्तता व्हावी याकरिता खरीप, रब्बी आणि त्यानंतर उन्हाळी पिके घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. यंदा त्यांनी भुईमुगाची लागवड केली. परंतु किडरोगाचा प्रादुर्भाव त्यासोबतच अवकाळी पावसामुळे बुरशीजन्य रोग वाढीस लागले.

Farmer Issue
Groundnut Loss: ‘भुईमूग शेंगाच नाही, तर आमचे स्वप्न वाहून गेले’

यातून जेमतेम एकरी सव्वा ते दीड क्‍विंटलवर उत्पादकता झाली. हा शेतीमाल इंदल पवार यांचा मुलगा गौरव याने विक्रीसाठी मानोरा बाजार समितीत आणला. मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल ठेवण्याची योग्य व्यवस्था नसल्याने अचानक आलेल्या

पावसात ७० ते ८० टक्‍के भुईमूग शेंगा वाहून गेल्या. या संदर्भाचे वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित होताच राज्यभरातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या बाजार समिती व्यवस्थेविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याची दखल थेट केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी थेट गौरव पवार यांना फोन लावत झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगून श्री. चौहान यांनी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून भरपाई मिळवून देण्याबाबत आश्‍वस्त केले. तसेच सोमवारपर्यंत (ता.१९) मदत मिळेल, असाही दावा त्यांनी केला होता.

Farmer Issue
Khandesh Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीने नुकसान वाढतेच

‘ॲग्रोवन’च्या आवाहनातून मिळाली मदत

‘ॲग्रोवन’ने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्यभरातून सामान्य नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने वीस हजार रुपयांची मदत मंगळवारपर्यंत (ता.२०) पवार कुटुंबीयांच्या खात्यात जमा झाली होती. त्यासोबतच मानोरा बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे यांनी देखील वीस हजार रुपयांचा धनादेश या कुटुंबाला दिला.

भुईमूग शेंगा वाहून गेल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. त्याची दखल घेत वाशीम जिल्हा प्रशासनाने या कुटुंबाला भरपाई मिळावी याकरिताच प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळताच निधी शेतकऱ्याला दिला जाईल.
भुवनेश्‍वरी एस, जिल्हाधिकारी, वाशीम
‘ॲग्रोवन’ने मोबाइल क्रमांकासह वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज्यभरातून भावनिक आधार देणारे फोन आले. अनेकांनी आर्थिक मदतही केली असून वीस हजार रुपये सध्या खात्यात जमा झाले आहेत. त्याबद्दल ‘ॲग्रोवन’चे आभार! मात्र प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा कायम आहे.
गौरव पवार, पीडित शेतकरी, बारवा, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com