Farmer Protest : आरएसएसच्या वक्तव्यावरून पंढेर यांचा पलटवार; म्हणाले, 'आरएसएस शेतकऱ्यांचा अपमान...'

Farmer leader Shravana Singh Pandher : शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला होता. यावरून शेतकरी नेते श्रवणसिंह पंढेर यांनी जोरदार पलटवार केला आहे.
Farmer Protest
Farmer Protest Agrowon
Published on
Updated on

Pune News :  पंजाब आणि हरियानातील शेतकरी हमीभाव कायद्यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी १३ फेब्रुवारीपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तर आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तीन सीमांवर आपला ठिय्या मांडला आहे. यादरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर महापंचायत आणि रेल्वे रोको आंदोलन केले होते. यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शनिवारी (ता.१६) शेतकरी आंदोलनावरून टीका केली होती. यावरून आता शेतकरी नेते श्रवणसिंह पंढेर यांनी जोरदार पलटवार केला आहे. तसेच आरएसएसच्या वक्तव्याचा निषेध करताना, 'आरएसएस देशातील ८० कोटी शेतकऱ्यांचा अपमान करत आहे', असे म्हटले आहे. 

देशात लोकसभा निवडणुकांची रणधूमाळी सुरू झाली असून निवडणूक आयोगाने शनिवारी (ता.१६) पत्रकार परिषद घेऊन देशातील लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. तर शेतकरी आंदोलनाद्वारे पंजाबमध्ये फुटीरतावादी दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केला होता.  

Farmer Protest
Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांचा इरादा पक्का ; निवडणूक काळातही सुरूच राहणार आंदोलन

यावरून शेतकरी नेते श्रवणसिंह पंढेर यांनी आरएसएसने शेतकरी आंदोलनावर दिलेल्या वक्तव्यावर जोरदार पटवार केला आहे. तसेच पंढेर यांनी, शेतकरी आंदोलनाचा आज ३५ वा दिवस असल्याचे सांगितले. तसेच आम्ही आरएसएसच्या वक्तव्याचा निषेध करत असून आरएसएस देशातील ८० कोटी शेतकऱ्यांचा अपमान करत आहे असे म्हटले आहे. तसेच आरएसएसला शेतकरी आणि मजुरांच्या मागण्यांचा, त्यांच्या आंदोलनाचा आदर करता येत नसेल, तर त्यांना शेतकऱ्यांचा अपमान करण्याचाही अधिकार नाही, असेही पंढेर यांनी म्हटले आहे. 

Farmer Protest
Delhi Farmers' Protest : दिल्लीत शेतकऱ्यांची महापंचायत; पंजाबमधील शेतकरी ८०० हून अधिक बस, ट्रक आणि अनेक गाड्यांमधून दिल्लीच्या दिशेने

तसेच गेल्या महिनाभरापासून शेकडो शेतकरी पंजाब-हरियाणाच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. दिल्ली चलो मोर्चा केला जात आहे. हा मोर्चा किसान आंदोलन २.० म्हणूनही ओळखला जात आहे. आता पंजाब आणि हरियाणासह इतर राज्यातील शेतकरी ही यात सहभागी झाले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांकडून आपल्या मागण्यांसाठी निदर्शने आणि रस्ता रोकोची दुसरी रचना आखली जात असल्याचेही पंढेर यांनी सांगितले आहे. 

काय म्हणाले होते आरएसएसचे सरचिटणीस?   

लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजकता पसरवण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाल्याचा आरोप सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी केला होता. होसाबळे यांनी, हा आरोप नागपुरात आयोजित प्रतिनिधी सभा २०२३-२४ मध्ये केला होता.

या आंदोलनातून पंजाबमध्ये 'अलिप्ततावादी दहशतवाद' पुन्हा डोके वर काढला आहे. फुटीरतावादी दहशतवाद पंजाबमध्ये पसरू लागला आहे. तर विशेषत: पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हे सुरू असल्याचे होसाबळे यांनी म्हटले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com