Agriculture Minister : कृषिमंत्र्यांकडून हप्तेखोरी करण्यासाठी कायद्याचा धाक, शेतकरी संघटनेचा आरोप

raghunath patil : कृषिमंत्र्यांकडून हप्तेखोरी करण्यासाठी कायद्याचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप रघुनाथ पाटील यांनी केला आहे.
Agriculture Minister
Agriculture Ministeragrowon
Published on
Updated on

Agriculture Minister News : कृषिमंत्र्यांकडून हप्तेखोरी करण्यासाठी कायद्याचा धाक दाखवला जात आहे. तसेच खते, बी-बियाणे विक्रेत्यांवर अन्यायकारक कायदे लादण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहेत. एखाद्या विक्रेत्याकडून चूक झालीच तर त्याच्यावर थेट एमपीडीए कायद्यासारखी कलमे लावले जातात त्यामुळे धास्तावलेले निविष्ठा विक्रेते व्यवसाय बंद करण्याचा धोका आहे. त्याविरोधात जनजागृती करण्यात येत आहे. अशी माहिती शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील व कार्याध्यक्ष कालिदास अपेट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, निविष्ठा विक्रेते यांच्याबाबतीत असे झाल्यास राज्य शासन बी-बियाणे, खतांचा पुरवठा करू शकेल का हा प्रश्न आहे. कृषिमंत्र्यांकडून हप्तेखोरी करण्यासाठी कायद्याचा धाक दाखवला जात आहे. त्याविरोधात जनजागृती करण्यात येत आहे,' अशी माहिती शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील व कार्याध्यक्ष कालिदास अपेट यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, 'कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन घेता आले तर शेती फायदेशीर ठरू शकते. मात्र आपल्याकडे कृषी निविष्ठांवर कर वसुली करू नये, अशी मागणी आहे. तरीही खतांसाठी ५ टक्के, कीटकनाशकांवर १४ टक्के, बायोनायट्रोजनवर १२ टक्के जीएसटी आकारणी होते.

यातून शेतकऱ्यांकडून एक लाख कोटीपेक्षा जास्त कर वसुली होत आहे. यातून उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे कर कमी करणे हाच पर्याय असताना या उलट निविष्ठा विक्रेत्यांवर नवे कायदे लादण्यात येत आहेत. याची भीती असल्याने बहुतेकजण व्यवसाय बंद करण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे भविष्यात शेती व्यवसाय संकटात येण्याची शक्यता आहे.

Agriculture Minister
Raghunath Dada Patil : रघुनाथदादा पाटील भारत राष्ट्र समितीत दाखल

राजू शेट्टी यांचे ऊस दर आंदोलन फार्सच

'ऊसदारासाठी आंदोलन सुरू असले तरी साखर कारखारदार व राजू शेट्टी यांच्यातील संगनमत उघड आहे. वास्तविक राजू शेट्टींच्या भूमिकेमुळे उसाला अपेक्षित दर मिळू शकलेला नाही हेही यापूर्वीच उघड झाले आहे. त्यामुळे आंदोलनाचा केवळ फार्स आहे,' अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली.

ते म्हणाले, 'कारखानदार म्हणतात एफआरएफपीच्यावर एफपीच्यावर दर जाऊ द्यायचा नाही. राजू शेट्टी यांची अप्रत्यक्ष तशीच भूमिका आहे. हे दोघांचेही मत एकच आहे. त्यामुळे आंदोलन फक्त होत राहील. आमच्या संघटनेने दोन साखर कारखान्यांच्या अंतराची अट रद्द करावी, अशी मागणी केली आहे. त्यावर शेट्टी काही बोलत नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com