
Palghar News : तालुक्यातील देवघर येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या शेतीला पसंती देऊन मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. प्रगतशील शेतकरी रामदास शांताराम पाटील यांनी आपल्या दोन एकर जागेवर विराण वाणाच्या नऊ हजार टोमॅटो रोपांची लागवड केली आहे.
सध्या टोमॅटोचे फळ तयार झाले असून २० दिवसांत काढणीस येणार आहे. टोमॅटो हे बारमाही मागणी असणारे आणि चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. घरगुती तसेच हॉटेल व्यवसायात टोमॅटोचा वापर सतत होत असतो. टोमॅटोत अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेही त्याला बाजारात चांगली मागणी आहे.
टोमॅटोपासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. या साऱ्या बाबी लक्षात घेता टोमॅटोची लागवड किती फायदेशीर ठरणारी आहे, याची कल्पना येते. वाडा तालुक्यातील रामदास पाटील यांनीही आपल्या दोन एकर जागेवर विराण वाणाच्या नऊ हजार टोमॅटो रोपांची लागवड केली आहे. यासाठी त्यांना दोन लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
पिकाची अवस्था
टोमॅटो पिकाची लागवड ही खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तिन्ही हंगामात करता येते. या पिकासाठी मध्यम ते भारी, परंतु उत्तम निचरा होणारी जमीन लागवडीयोग्य असते. पीक फुलावर असताना आणि फळांची वाढ होताना नियमित पाणीपुरवठा होणे महत्त्वाचे आहे.
रोपाला काठीचा आधार दिल्यास झाडांची आणि फांद्याची वाढ चांगली होते. फळे भरपूर लागतात. टोमॅटो फळांची हिरवी पक्व अवस्था, गुलाबी अवस्था आणि पूर्व पक्व अवस्था अशा अवस्थांमध्ये काढणी करावी, असे शेतकरी रामदास पाटील यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.