
Dharashiv News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनांची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता. २) लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश गोरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
सरकारकडून निवडणुकीत दिलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ अमलात आणावी, शेतमालाला हमीभाव मिळावा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आतापर्यंत राज्यातील पन्नास हजार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे, ही बाब महाराष्ट्राला भूषणावह नाही.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पेरणीपूर्वी बी-बियाणे व खते वेळेवर व मोफत उपलब्ध करून द्यावीत, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचे लेखी आश्वासन द्यावे, तसेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी करीत कृषिमाल व पूरक वस्तूंची आयात बंद करून स्थानिक उत्पादनास प्रोत्साहन दिले जावे,
कृषी विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात याव्यात व फळबाग योजनेतील अनुदानात वाढ करावी, आदी मागण्यांचे निवेदन या वेळी नायब तहसीलदार नाना मोरे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष महेश गोरे, तालुका उपाध्यक्ष तानाजी पाटील, प्रशांत थोरात, बळी गोरे, तुळशीदास पवार, युवराज तोडकरी, शिवाजी लकडे, निशिकांत कांबळे, संजय मुर्टे, देविदास बिराजदार, मुरलीधर मोरे, श्रीकृष्ण गंगणे, संजय माने, अरुण मोरे, रंगनाथ तोडकरी, ईश्वर मोरे, प्रभाकर मोरे, राम सूर्यवंशी व शेतकरी सहभागी झाले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.