
Pune News : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदे बाजारातील व्यवहारांमध्ये उद्भवणाऱ्या जोखमींचे व्यवस्थापन करण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. यासाठी एका व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या कक्षामार्फत जोखीम व्यवस्थापनाचे धोरण ठरविणे व अहवाल तयार करणे, शेतीमाल गुणवत्ता व किमतीमधील विसंगती कमी करणे, एफपीसींसाठी ६० प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे तसेच ५० एफपीसींना वायदे बाजारात व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देणे, सरकारी यंत्रणेच्या मदतीने वायदे बाजाराचे प्रायोगिक प्रकल्प राबवणे अशी कामे केली आहेत. शेतीमालाच्या बाजारपेठांमधील चढउतार कायम शेतकऱ्यांच्या चिंतेची बाब असते.
दर्जेदार माल असूनही योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे उत्पन्नातील ही अस्थिरता कमी करण्याच्या नियोजनासाठी ‘स्मार्ट प्रकल्प हेजिंग डेस्क’ अर्थात वायदे बाजारातील जोखीम व्यवस्थापन संकल्पना कृषी विभागाने दोन वर्षांसाठी स्वीकारली आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
शेतीमालाच्या भावातील जोखीम अभ्यासणे व शेतकऱ्यांना सल्ला देण्याचे काम याद्वारे केले जाणार आहे. त्यासाठी स्मार्ट व ‘एनसीडीईएक्स इस्टिट्यूट ऑफ कमॉडिटी मार्केट्स अँड रिसर्च’ यांच्यात अलीकडेच करार झाला. या वेळी प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, एनआयसीआरचे उपाध्यक्ष नीरज शुक्ला, अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, अनिल गवळी, बाजार विश्लेषक अभय गायकवाड व पीक विश्लेषक डॉ. ब्रह्मानंद देशमुख उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.