
Sindhudurg News : जिल्ह्यातील कोलझर (ता. दोडामार्ग) येथे दोन हत्तींचे कळप दाखल झाले असून या कळपांकडून नारळ, सुपारी, केळी आदी पिकांचे नुकसान सुरू आहे. सहा हत्तींचा वावर गावात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींचा वावर कायम असतो. महिनाभरापूर्वी येथून गेलेले हत्ती दहा-पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा दाखल झाले आहेत. हत्तींचे दोन कळप आहेत. हे कळप गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे वावरत होते.
एका कळपामध्ये चार तर दुसऱ्या कळपात दोन हत्ती होते. दरम्यान हे दोनही कळप आता कोलझरमध्ये एकत्र वावरत आहेत. या हत्तींकडून नारळ, सुपारी, केळी पीक जमीनदोस्त केले जात आहे.
कोलझर येथील दिलीप अमृत देसाई, अनिल अमृत देसाई आणि मेघश्याम देसाई या तीन शेतकऱ्यांने मोठे नुकसान हत्तींच्या कळपाने केले आहे. खरीप हंगामाची कामे सध्या सुरू झाली आहेत.
हत्ती पकड मोहीम कधी?
जिल्हा सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी हत्ती पकड मोहिमेसाठी दोडामार्ग वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. या वेळी हत्ती पकड मोहीम राबविण्याचे आश्वासन वन विभागाने दिेले आहे. ही मोहीम नेमकी कधी राबविणार, असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.