डॉ. कैलास डाखोरे यादव कदमFarmers Advised: यंदाचे वर्ष हे ‘एल निनो’ असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने दुष्काळी स्थितीच्या गंभीर संकटाला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज राहणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीने मूलस्थानी जलसंधारण, पेरणीचा योग्य कालावधी व वाण निवडावेत. त्या अनुषंगाने पेरणी पद्धतींचा वापर करणे, मशागत, अन्नद्रव्ये व सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासोबतच शास्त्रज्ञांनी केलेले मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणारे आहे..सन २०२६-२७ हे वर्ष एल निनो वर्ष असल्याचे दर्शविण्यात आले आहे. विशेषतः मराठवाडा विभागासारख्या कमी पावसाच्या प्रदेशांमध्ये त्याचा अधिक परिणाम जाणवतो. शेतकऱ्यांसाठी हे संकटच आहे. परंतु योग्य नियोजन व पूर्वतयारीमुळे शेतीचे व पिकांचे योग्य व प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य आहे..Kharif Agriculture Planning: खते-बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.‘एल निनो’ म्हणजे काय?एल निनो हा प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्तवाढण्याचा हवामानातील नैसर्गिक प्रकार आहे. विशेषतः दक्षिण अमेरिकेजवळील मध्य व पूर्व प्रशांत महासागरातीलपाणी उबदार होते. यामुळे जगभरातील वारे, पर्जन्यमान आणि तापमानाच्या पद्धती बदलतात. एल निनो हा स्पॅनिशशब्द असून त्याचा अर्थ लहान मुलगा किंवा ख्रिस्त बालक असा होतो. जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान वाढते आणि पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. ढग जमलेली पाण्याची वाफ ते तिकडे वाहून नेतात. त्या वेळी पूर्वेकडील भागात अतिवृष्टी तर पश्चिमेकडील भागात दुष्काळी स्थिती असा एल निनोचा परिणाम दिसतो..मुख्य वैशिष्ट्येसमुद्राच्या पाण्याचे तापमान वाढतेपूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे व्यापारी वारे कमकुवत होतात.भारतासह अनेक देशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते.दुष्काळ, उष्णतेची लाट आणि पिकांवर ताण वाढू शकतो..होणारे सर्वसाधारण परिणाममॉन्सून पाऊस कमी पडण्याची शक्यता.कोरडवाहू पिकांवर ताण.पावसाला उशीर व कमी पर्जन्यमान.दीर्घ कोरडे कालखंड.पावसाचे अनियमित वितरण.तापमानात वाढ. बाष्पीभवन जास्त.मातीतील आर्द्रता कमी.जलसाठ्यात घट..पिकांवर होणारे परिणामपेरणी उशिरा किंवा अयशस्वी.उगवण कमी होणे.पिकांच्या वाढीवर परिणाम.सोयाबीन, तूर आदी पिकांत फूलधारणा व शेंगा भरण्यावर परिणाम.कापूस पिकात फूलगळ व बोंडगळ दिसून येणे.उत्पादनात घटकिडी- रोगांचा वाढता प्रादुर्भाव.एल निनोच्या पार्श्वभूमीवर पेरणीपूर्व नियोजनखोल नांगरट महत्त्वाचीनांगरट खोल केल्याने जमिनीचा कठीण थर फोडला जातो व मुळांची वाढ चांगली होते. पावसाचे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात मुरते व जलसंधारण होते. तणे, किडींची अळी अवस्था व रोगकारक घटक उन्हामुळे नष्ट होण्यास मदत होते. जमिनीतील हवा खेळती राहून सूक्ष्मजीवांची क्रिया वाढते. ओलावा अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पिकांना फायदा होतो. जमिनीची भुसभुशीतता वाढून पेरणी सुलभ होते. मुळांची वाढ खोलवर होत असल्याने अन्नद्रव्यांचे शोषण अधिक चांगले होते. पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुधारतो व पाणी साचण्याची समस्या कमी होते. उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत होते. विशेषतः कोरडवाहू व मराठवाडा भागात खोल नांगरट ही हवामान बदल व कमी पावसाच्या परिस्थितीत उपयुक्त उपाय आहे..शेततळे आणि जलसंधारण उपायपावसाचे पाणी साठवून दुष्काळी काळात त्याचा सिंचनासाठी उपयोग करता येतो. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते. पिकांना आवश्यक वेळी पाणी उपलब्ध झाल्याने उत्पादन वाढते. मृदा धूप कमी होते व सुपीक मातीचे संरक्षण होते. ठिबक व तुषार सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध राहतो. कमी पावसाच्या परिस्थितीतही पिकांची जोखीम कमी होते. जलसंधारणामुळे परिसरातील ओलावा टिकून राहतो व सूक्ष्म हवामान सुधारते. एल निनोसारख्या परिस्थितीत शेती अधिक टिकाऊ बनते..नाला बांध, कंपार्टमेंट बंडिंगशेतातून वाहून जाणारे पाणी थांबवून जमिनीत मुरण्यास मदत होते. मृदा धूप कमी होते. तसेच सुपीक माती वाहूनजाण्यापासून संरक्षण मिळते. जमिनीतील ओलावा टिकतो. पिकांना अधिक काळ आवश्यक आर्द्रता उपलब्ध राहते. भूजल पातळी वाढते. पाणी जमिनीत झिरपल्यामुळे विहीर व बोअरचे पाणी वाढण्यास मदत होते. कमी पावसाच्या काळात पिकांना आधार मिळतो. ओलावा व माती संरक्षणामुळे उत्पादन सुधारते. पावसाचे पाणी साठवून पुढील कालावधीसाठी त्याचा उपयोग करता येतो..सेंद्रिय खतांचा वापरआणि जमीन सुपीक करणेसेंद्रिय खतांचा वापर वाढवल्याने जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो व माती भुसभुशीत राहते. मातीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहतो, त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पिकांना फायदा होतो. नत्र, स्फुरद, पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात उपयुक्त जिवाणू सक्रिय राहून अन्नद्रव्यांचे रूपांतर ते सुलभ पद्धतीने करतात. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते. उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. पिकांची वाढ व उत्पादन सुधारते : पिकांची मुळे मजबूत होऊन उत्पादनाची गुणवत्ता वाढते. जमिनीची प्रतिकारशक्ती वाढल्याने उष्णता व कमी पावसाच्या परिस्थितीत पिके अधिक तग धरतात..मूलस्थानी जलसंधारणमूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचे पाणी ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणीच अडवून जमिनीत मुरविण्याचीप्रक्रिया होय. यामुळे मातीतील ओलावा टिकून राहतो. पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होते. मूलस्थानीजलसंधारण हे शाश्वत शेतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पाणी, माती व पीक उत्पादन यांचे संरक्षण करण्याचा तो प्रभावी उपाय आहे. समतल बांधबंदी, कंटूर बांध, कंपार्टमेंट बंडिंग, खोल नांगरट, सरी-वरंबा पद्धत, आच्छादन (Mulching) या मूलस्थानी जलसंधारणाच्या पद्धती आहेत..पेरणीपद्धती आणि महत्त्वएल निनो परिस्थितीत पावसाचे प्रमाण कमी, पावसात खंड किंवा उशिरा पाऊस येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पिकांना उपलब्ध ओलाव्याचा योग्य वापर होण्यासाठी योग्य पेरणी पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यकअसते. एल निनोच्या पार्श्वभूमीवर योग्य पेरणी पद्धतींचा अवलंब करावा. त्यामुळे कमी व अनियमित पावसातही पिकांचे संरक्षण करून उत्पादन टिकवून ठेवणे शक्य होते..१) पेरणीची सरी-वरंबा पद्धतपिकांची पेरणी वरंब्यावर केली जाते.पावसाचे पाणी सरीमध्ये साचून जमिनीत मुरते.अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो.ओलावा जास्त काळ टिकतो.पाण्याची कार्यक्षमता वाढते.सोयाबीन, तूर, कापूस, मका या पिकांसाठी उपयुक्त..२) रुंद वरंबा व सरी पद्धतकाळ्या जमिनींमध्ये विशेष उपयुक्त.पावसाचे पाणी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.पावसाचे अतिरिक्त पाणी सरीमध्ये साचते.पाणी हळूहळू जमिनीत मुरते.पिकांच्या मुळांना योग्य प्रमाणात ओलावा मिळतो.पाणी साचून राहिल्यामुळे होणारे नुकसान कमी होते.जलसंधारण वाढते.पाणी साचल्यामुळे होणारे नुकसान कमी होते.दुष्काळ व अतिवृष्टी दोन्ही परिस्थितीत फायदेशीर..३) कंटूर पेरणीउताराच्या जमिनीत समपातळी रेषेत पेरणी केली जाते.मृदा धूप कमी होते.पावसाचे पाणी अडविले जाते.जमिनीत पाणी झिरपण्याची क्षमता वाढते.. Kharif Agriculture Planning: खरिपासाठी बी-बियाणे, खते उपलब्ध करून द्या: आमदार सुहास बाबर .४) आंतरपीक पद्धतीने पेरणीदोन किंवा अधिक पिकांची एकत्र लागवड.उदा. सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक मूग.अशा पद्धतीमुळे जोखीम कमी होते.कमी पावसात एक पीक तरी टिकते.जमिनीचा कार्यक्षम वापर होतो..‘एल निनो’ वर्षासाठी विशेष शिफारशीपुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.उशिरा पाऊस झाल्यास कमी कालावधीचे तसेच दुष्काळ सहनशील वाण निवडावेत.पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण तपासून पाहावी.बीजप्रक्रिया करूनच तसेच योग्य अंतर ठेवून पेरणी करावीआंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.पेरणीसाठी शक्यतो बीबीएफ किंवा बेड पद्धतीचा अवलंब करावा.हवामान अंदाजावर आधारित निर्णय घ्यावेत.पीक फेरपालट करावी.ठिबक आणि तुषारसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर करावा..पेरणी पूर्वमशागत, आंतरमशागत, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण व पीकसंरक्षण परिस्थितीनुरूप योग्य अशा पद्धतींचा अवलंब करावा. वेळेवर आंतरमशागतीचे कामे करावीत..वाणाची निवडसोयाबीनलवकर येणारे वाणएमएयूएस-७१ (समृद्धी), एमएयूएस-१५८, एमएयूएस-६१२, जवाहर (जेएस-३३५), एमएयूएस- ७२५, एमएयूएस-७३१.मध्यम उशिरा येणारे वाणप्रसाद (एमएयूएस-१), प्रतिकार (एमएयूएस-६१), एमएयूएस-१६२, प्रतिष्ठा (एमएयूएस ६१-२).तूरबीडीएन ७११बीडीएन ७१६ (एका सिंचनाची सोय असल्यास)बीडीएन २०१३-२ (रेणुका) (एका सिंचनाची सोय असल्यास)बीडीएन २०१३-४१ (गोदावरी) (दोन सिंचनाच्या सोई असल्यास).मूगबीएम २००२-०१बीएम २००३-२फुले सुवर्णाफुले चेतक.उडीदटीएयू १पीडीकेव्ही ब्लॅक गोल्डफुले राजनफुले वसूबाजरीसबुरी श्रद्धा.सूर्यफूलमॉर्डनएलएस - ८एस- ११.आंतरपीक पद्धतीसोयाबीन अधिक तूर (४:२)कापूस अधिक तूर (४:१, ८:२)कापूस अधिक मूग (१:१)कापूस अधिक उडीद (१:१)कापूस अधिक सोयाबीन (१:१)तूर अधिक सोयाबीन (४:२)तूर अधिक मूग (१;२)तूर अधिक उडीद (१:२)तूर अधिक ज्वारी (३:३).अन्नद्रव्यांची फवारणीमुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. खालील काही निवडक उदाहरणे.मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२१९- १९- १९दोन टक्के युरिया फवारणी..पावसाचा खंड पडल्यास उपायपावसात खंड पडल्यास योग्य वेळी आंतरमशागतीची कामे केल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तण नियंत्रण होते व पिकांची वाढ सुधारून उत्पादनातील घट कमी करता येते.जमिनीत पुरेशी ओल असताना मशागत करावी. अतिशय खोल मशागत टाळावी. पिकांच्या मुळांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.पोटॅशिअम नायट्रेटची (१३:००:४५) फवारणी पिकांच्या वाढीस तसेच ताण सहनशक्ती वाढीस व उत्पादन सुधारण्यासाठी प्रभावी उपाय आहे. विशेषतः एल निनो व कमी पावसाच्या परिस्थितीत ती अत्यंत उपयुक्त ठरते..पावसामध्ये खंड पडल्यास पिकांना जीवनदायीपाणी देण्यासाठी संरक्षक सिंचन अत्यंत महत्त्वाचेठरते. उपलब्ध कमी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धती उपयुक्त आहेत.कोरडवाहू शेतीमध्ये पेरणीची वेळ फार महत्त्वाची आहे. उदा. खरीप ज्वारीची पेरणी सात जुलैपर्यंत केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव कमी होतो. उत्पादनात घट येत नाही.मराठवाडा विभागासाठी खरीप हंगामातील पिकांनुसार पेरणी कालावधी निश्चित केला आहे. शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार त्यानुसार नियोजन करावे.डॉ. कैलास डाखोरे ९४०९५४८२०२(लेखक अखिल भारतीय समन्वयित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे शास्त्रज्ञ आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.