
Parbhani News : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतककऱ्यांनी शुक्रवार (ता.२५)पर्यंत ई-पीकपाहणी करणे बंधनकारक आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना परभणी जिल्ह्यात युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपन्यामार्फत राबविली जात आहे.
२०२४ च्या मृग बहार चिकू, डाळिंब, पेरू, मोसंबी, लिंबू, संत्रा, सीताफळ या फळपिकांसाठी तर २०२४-२५ मध्ये आंबिया बहर आंबा, केळी, डाळींब, पपई, मोसंबी, संत्रा या फळपिकांसाठी हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. फळपिकांचा विमा अर्ज दाखल केलेल्य परंतु फळपिकांची ई-पीकपाहणी डीजिटल क्रॉप सर्व्हे मोबाइल अॅपद्वारे केलेली ई-पीकपाहणी न केलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवार (ता. २५) पर्यंत ई-पीकपाहणी पुर्ण करावी.
अन्यथा १२ जून २०२४ च्या शासन निर्णयामधील तरतुदी नुसार ७-१२ उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.