Dhule Rain : धुळ्यात सततच्या पावसामुळे बळीराजा त्रस्त; धुळे शहरातील पुलावरून नागरिकांना प्रवेश बंदी

Rain News in Dhule : धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धुळे शहरातील नदीवरील पुलावरची वाहतुकीला प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
Dhule Rain
Dhule RainAgrowon
Published on
Updated on

Dhule News : धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांतील पाणी वाढले आहे. तर शनिवारी आणि रविवारी (ता. २५) झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सध्या पांझरा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येत असून नदीवर असणाऱ्या पुलावरील वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहत असून याचा फटका शेती पिकाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतातील पीक सडण्याची भीती असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. तर गेल्या दोन तीन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

छोटा पूल पाण्याखाली जाण्याची भीती

धुळे जिल्ह्यात गेल्या दोन ते दिवसापासून मुसळधारा पाऊस होत असून अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर अद्यापही आहे. त्यातच हवामान विभागाकडून रविवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. याचदरम्यान अक्कलपाडा धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून ७ जहार ७०० क्यूसेक वेगाने पांझरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

Dhule Rain
Heavy Rain Khandesh : खानदेशात पावसाचा हाहाकार

पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर नदीपात्रात पाणीपातळी वाढल्यास येथील छोटा पूल पाण्याखाली जाण्याची भीती असते. यामुळे प्रशासनातर्फे आधीच खबरदारी घेत नदीवरील छोटा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. येथे खबरदारीचा उपाय बॅरिगेटिंग करण्यात आली असून पुलावरून प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच अग्निशमन विभागाचे जवान आपत्कालीन परिस्थितीसाठी पूलावर तैनात असून नागरिकांनी या पुलावरून प्रवास करू नये, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

जिल्ह्यात पीक सडण्याची भीती

मागील दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा फटका शेती पिकांना बसण्याची शक्यता आहे. येथे मुसळधार पावसामुळे कपाशी त्याचबरोबर सोयाबीन शेतात पाणी साचून राहत आहे. ज्यामुळे शेतातील पीक सडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तर असेच पाणी साचून राहिल्यास पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची भीती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com