
Kolhapur Dudhganga Dam : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याच्या पनोरी येथील दुधगंगा डावा कालवा पात्राचा तळभागातून भले मोठे घळाचे भगदाड पडले आहे. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन हजारो हेक्टर बागायत शेतपिकाचे नुकसान झाले आहे. वारंवार घडणाऱ्या कालवा फुटीचा घटनेमुळे कालव्याचा मजबुतीविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
सध्या काळम्मावाडी धरणातून दुधगंगा डाव्या व उजव्या कालव्यात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. गुरूवार (ता.०५) पहाटे मध्यरात्री पाण्याचा जोरदार प्रवाहाने पनोरी येथील बोगद्याजवळ घळ पडला. बघताबघता या घळाने आपला आकार जवळपास दहा फुट व्यासाचा झाला. आणि रात्रभर त्यातून पाण्याचा विसर्ग होऊन कालव्याखालील हजारो हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले. संपूर्ण शिवार जलमय होऊन शिवाराला महापुराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तसेच दुधगंगा नदीला मातीमिश्रित गढुळ पाणी आले आहे.
काळम्मावाडी धरणापासून डाव्या व उजव्या या दोन्ही कालव्याचा दहा ते बारा किलोमीटरचा अंतरावर अशा घटना घडत असतात. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून पाटबंधारे विभागाने त्याची वेळीच दखल घेऊन डागडुजी करावी अशी मागणी होत आहे.
जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री . म्हेत्रे व कार्यकारी अभियंता अशोक पवार व कार्यकारी अभियंता स्मिता माने तसेच तहसीलदार राधानगरी अनिता देशमुख तसेच तालुका कृषी अधिकारी राधानगरी यांनी पाहणी केली. यामध्ये ऊस शेतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.