Maharashtra Drought : २२४ महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित

Maharashtra Drought Conditions : गेल्या वर्षी पाऊस कमी झाला. याचा परिणाम यंदा जानेवारीच्या मध्यातच राज्यातील विविध जिल्ह्यात पाहायला मिळाला. राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ घोषित केला. तर या ४० तालुक्यात १०२१ महसुली मंडळात दुष्काळसदृश स्थिती असल्याचे जाहीर केले होते.
Maharashtra Drought
Maharashtra Drought Agrowon

Pune News : गेल्या वर्षी राज्यात सरकारीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे यंदा राज्यातील विविध तालुक्यांमध्ये दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. याच्याआधी राज्यात जानेवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा बसू लागल्याने जनावरांसह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. यामुळे राज्य शासनाने राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ घोषित केला. यानंतर आता नव्या २२४ महसुली मंडळात देखील दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढला आहे.

२२४ नवीन महसुली मंडळे

राज्यातील १०२१ महसुली मंडळात दुष्काळसदृश स्थिती असल्याचे याच्याआधीच सरकारने जाहीर केले होते. पण याव्यतिरीक्त २२४ नवीन महसुली मंडळातील दुष्काळसदृश स्थितीबाबत प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. त्यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन महसुली मंडळात देखील दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

Maharashtra Drought
Drought Condition : नवीन २० महसूल मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित

दुष्काळसदृश स्थिती

जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. राज्यात या कालावधीत ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे राज्यातील ४० तालुक्यातील १०२१ महसुली मंडळांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली होती.

पण या १०२१ महसुली मंडळातून विभाजीत झालेली आणि लातूर जिल्हाधिकारी यांच्या प्रस्तावातील २२४ महसुली मंडळांत ही घोषणा झाली नव्हती. त्यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही अशा देखील महसुली मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

Maharashtra Drought
Drought Update : सांगली जिल्ह्याचा ३१ कोटींचा टंचाई आराखडा

१९ जिल्ह्यातील नवी २२४ महसुली मंडळे

राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने काढेलल्या शासन निर्णयात १९ जिल्ह्यातील नवे २२४ मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या दुष्काळ सदृश्य मंडळात सर्व सवलती तातडीने लागू करण्यात आल्या आहेत. यात जमीन वसुलित सवलत, कृषी पंप, तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफीसह अनेक सवलती आहेत. यांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन सरकारने केले आहे.

सर्वाधिक अहमदनगर सर्वात कमी सांगली

तसेच नव्या यादीत अहमदनगरमधील ३४, धुळे २३ आणि जळगावमधील २४ दुष्काळग्रस्त मंडळांचा समावेश आहे. याबरोबरच पुणे १४, कोल्हापूर ०५, सातारा १२, सांगली ०२, सोलापूर १०, नाशिक १३, छत्रपती संभाजी नगर १६, जालना ०३, नांदेड ०५, हिंगोली ०७, परभणी १३, बीड १९, वर्धा ०३, नागपूर ०५, धाराशिव १०, लातूर ०६ अशी मंडळे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com