
Nanded News : नांदेड जिल्ह्यात अर्धाअधिक पावसाळा संपत आला असताना मध्यम प्रकल्पासह एकूण १०४ प्रकल्पातील पाणीसाठा मात्र निम्म्यावर आहे. सध्या जिल्ह्यातील प्रकल्पात ४०६.१६ दलघमीनुसार ५६.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात ५३५.२२ दलघमीनुसार ७३.५१ टक्के पाणीसाठा होता.
नांदेड जिल्ह्यात यंदा जूनमध्ये पावसाअभावी धरणसाठ्यात कमालीची घट झाली होती. ८० प्रकल्प असलेल्या लघू प्रकल्पात तसेच नऊ प्रकल्प असलेल्या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला होता. नांदेड जिल्ह्यातील एकूण १०४ प्रकल्पात २०३.३९ दशलक्ष घनमीटरनुसार २७.९३ टक्क्यांवर खाली आला होता. यानंतर जुले महिन्यात झालेल्या पावसाने २०० दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढला आहे. सध्या जिल्ह्यातील १०४ प्रकल्पात ४०८.१६ दलघमीनुसार ७३.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. परंतु हा साठा मागील वर्षाच्या तुलनेत १२७.०६ दलघमीनुसार १७.४५ टक्के कमी आहे. यातील नऊ मध्यम प्रकल्पात मात्र हा साठा निम्म्यावर आहे.
सध्या जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ६६.८० दलघमीनुसार ८२.६८ टक्के पाणीसाठा झाला आहे. यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ४८५.२१ दलघमीनुसार ५९.९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर सिद्धेश्वर प्रकल्पात ३५.८६ दलघमीनुसार ४४.३० टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ६२०.६३ दलघमीनुसार ६४.३७ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.