Ajit Pawar : लोकसभेसारखी चूक विधानसभेत करू नका

Maharashtra Politics Update : ‘‘केंद्रात मोदी यांचे नेतृत्वातील सरकार आहे. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीला जागा मिळाल्या तरी त्याचा कोणताही फायदा राज्याला होणार नाही. परिणामी, लोकसभेसारखी चूक या वेळी करू नका,’’
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Bhandara News : ‘‘केंद्रात मोदी यांचे नेतृत्वातील सरकार आहे. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीला जागा मिळाल्या तरी त्याचा कोणताही फायदा राज्याला होणार नाही. परिणामी, लोकसभेसारखी चूक या वेळी करू नका,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. २८) केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची न्याय सन्मान यात्रा शनिवारी भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदार संघात दाखल झाली या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी दादांनी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना, कृषिपंप वीजमाफी यांसारख्या योजनांची माहिती महिलांना सांगताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते फक्त आरोप करतात अशी टीका केली.

Ajit Pawar
Ajit Pawar : सेवा संस्थांमधील शेतकरी भागमर्यादा ५० हजार करा

लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी संविधान बदलणार असल्याचे सांगून तुमची दिशाभूल केली. मात्र संविधान कोणी बदलू शकत नाही हे लक्षात ठेवा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास तुमच्या जीवनात काही एक फरक पडणार नाही. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा जेवढा विकास आम्ही केला ती करण्याची विरोधकांमध्ये धमक नाही. शेतकऱ्यांचे काही प्रश्‍न केंद्राकडून सोडवून आणावे लागतात.

Ajit Pawar
Maharashtra Politics : अजित पवार यांच्यासह महायुती एकत्रित लढणार

विकासासाठी निधी खेचून आणावा लागतो. महाविकास आघाडीला निवडून दिल्यास त्यांचे उत्तर ठरलेले राहणार आहे. केंद्रात आपले सरकार नाही, आमचे तिथे कोणी ऐकतच नाही, अशी उत्तरे देऊन ते बोळवण करतील. संविधान बदलणार अशी भीती दाखवून लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी तुमची मते घेतली. दिशाभूल केली. आताही केंद्रात मोदी यांचेच सरकार आहे. संविधानाला कोणी हात लावलेला नाही. आम्ही जय हिंद आणि जय भीम म्हणणारे आहोत. त्यामुळे कोणी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोणालाही एकटे सोडणार नाही,’’ असा धीरही या वेळी अजित पवार यांनी कार्यक्रमाला आलेल्या दलित, मुस्लिम, आदिवासी बांधवांना दिला.

‘गोंदिया-भंडाऱ्यातील शेतकऱ्यांना न्याय देणार’

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण हे गोंदिया जिल्ह्याचे जावई आहेत. त्यामुळे गोंदिया-भंडाऱ्यातील शेतकऱ्यांना ते रिकाम्या हाताने पाठवणार नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनोदाने सांगितले. सध्या शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्‍न आहेत त्याची सोडवणूक केवळ केंद्र सरकार स्तरावर शक्य आहे त्याकरिता देखील आम्ही पाठपुरावा करीत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com