Compensation Demand : केवळ पंचनामे अन् घोषणा नकोत; पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना भरपाई द्या

MLA Kailas Patil : नुकसानीचे केवळ पंचनामे व भरपाईच्या घोषणा न करता, शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव डॉ. सोनिया शेठ यांच्याकडे केली आहे.
MLA Kailas Patil
MLA Kailas Patil Agrowon

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला आहे. वादळी वारा व विजेच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडून गेल्याने शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

या स्थितीत नुकसानीचे केवळ पंचनामे व भरपाईच्या घोषणा न करता, शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव डॉ. सोनिया शेठ यांच्याकडे केली आहे. आमदार पाटील यांनी डॉ. सेठ यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले व चर्चाही केली.

MLA Kailas Patil
Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती झाली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे पिके, फळबागा, राहती घरे, जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड यांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज पडून शेतकरी व जनावरांचे मृत्यू झाले आहे. या नुकसानीची भरपाई तातडीने शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी बी-बियाणे व खते खरेदीसाठी पैसे नाहीत. या स्थितीत नुकसानीचे केवळ पंचनामे न करता व घोषणा न करता पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ११ एप्रिल व त्यानंतर २० एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले होते.

MLA Kailas Patil
Crop Damage Compensation : सांगलीतील ७३ हजार शेतकऱ्यांना १९ कोटींचा परतावा

या नुकसानीच्या भरपाई पोटी दोन हजार ६४२ शेतकऱ्यांना चार कोटी ७८ लाख रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे दिला आहे. हा प्रस्ताव तातडीने मागवून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. धाराशिव, लोहारा, वाशी या तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, उर्वरित कळंब, तुळजापूर, उमरगा, भूम, परंडा तालुक्यांतील ३३ मंडलांना दुष्काळसदृश म्हणून घोषित केले आहे.

या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणे दुष्काळी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु अद्याप एक रुपयाचीही मदत मिळाली नसल्याचेही आमदार पाटील यांनी डॉ. सेठ यांच्या निदर्शनास आणून दिले. मागण्यांबाबत डॉ. सेठ यांनी सकारात्मकता दाखवत लवकर भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न करण्याचे सांगितल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com