
Ahilynagar News : गव्हाची काढणी केल्यानंतर उरलेले अवशेष शेतकरी जाळत आहेत. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू काढणीनंतर अवशेष (काड) न जाळता त्याची कुट्टी करून जमिनीत गाडावे, असे अवाहन माजी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी केले.
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी झाली होती. आता बहुतांश भागात गव्हाची काढणी होत आहे. अलिकडच्या काही वर्षांपासून शेतकरी गव्हाच्या काढणीसाठी यंत्राचा वापर करत आहेत.
त्यामुळे मजूर टंचााईवर मात करता येत आहे. मात्र गव्हाची काढणी केल्यानंतर राहिलेले अवशेष (काड) शेतकरी पेटवून देत आहेत. त्यामुळे मातीचे नुकसान होत असल्याने याबाबत नेवासा तालुक्यात डॉ. अशोक ढगे हे शेतकऱ्यांनी गव्हाचे काड पेटवून न जमिनीत गाडावे, असे अवाहन करत जनजागृती करत आहेत.
त्यांनी सांगितले, की शेतकरी अनेक वर्षांपासून गव्हाच्या काढणीनंतरचे अवशेष सर्रास पेटवून देत. अलिकडे याबाबत काही शेतकऱ्यांत जागृती झाली असली तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. गव्हाचे काड हे सेंद्रिय पदार्थ आहे.
ते जमिनीत गाडल्यास जमिनीची सुपीकता वाढते व उत्पादन वाढीला मदत होते. तसा काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे. उलट जाळल्यावर मातीमधील जिवाणूंचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाचा काड जाळू नये, त्याऐवजी ते शेतातील जमिनीत गाडावा, असे आवाहन करत जनजागृती केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.