Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले सिंदखेडराजा आणि धार्मिक वारसा असलेले शेगाव ही दोन महत्त्वाची शहरे थेट जोडण्यासाठी नवा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
मात्र सध्याचे रस्ते चांगले असून नवीन महामार्ग तयार करू नका, आमच्या जमिनी घेऊन भूमिहीन बनवू नका, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. चिखली तालुक्यातील पांढरदेव येथे नागरिकांनी या विरोधात फलक झळकावत आक्रमक भूमिका घेतली आहे.
सिंदखेडराजा-शेगाव महामार्गामुळे समृद्धीद्वारे प्रवाशांना थेट मुंबईला विनाअडथळा जाता येईल, अशी यामागे संकल्पना पुढे केली जात आहे. मुंबईवरून शेगावला विनाअडथळा प्रवास करण्यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला हा प्रस्तावित रस्ता जोडला जाईल. या रस्त्यात ४७ गावांतील काळी कसदार हजारो हेक्टर जमीन जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. सध्याचे पर्यायी चांगले रस्ते उपलब्ध असतानाही या महामार्गाची उठाठेव कशासाठी, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
सिंदखेडराजा ते शेगाव असे १०९ किलोमीटरचे अंतर आहे. नवीन महामार्गामुळे फक्त १५ ते २९ किलोमीटर अंतर कमी होईल. सुपीक जमीन यात जाणार असल्याच्या शक्यतेने शेतकरी या महामार्गास विरोध करू लागले आहेत. त्यांनी पांढरदेव येथे सरकारचा जाहीर निषेध केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.