
Swabhimani Shetkari Sanghatna Protest : ऊस दराच्या प्रश्नावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या घरी जाऊन त्यांना खर्डा-भाकरी आणि कांदा देऊन गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाची एफआरपी आणि अधिक ४०० रुपयांची मागणी केली.
गतवर्षीच्या हंगामातील गाळप केलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा, या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी शिरोळमधून १७ ऑक्टोबर रोजी आक्रोश पदयात्रेला सुरुवात केली. या यात्रेला शेतकऱ्यांमधूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. २२ दिवसांच्या पदयात्रेची सांगता करत असताना जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत चारशे रुपयांची मागणी करत ठिय्या आंदोलनाचीही घोषणा शेट्टी यांनी यावेळी केली.
यावेळी शेट्टींनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नसेल, तर कारखानदारांचीही दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. राजू शेट्टी यांचे जयसिंगपूरातील विक्रमसिंह मैदानात ठिय्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज धनत्रयोदशीच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याचे अध्यक्ष व संचालकांच्या घरी जाऊन त्यांना खर्डा, भाकरी आणि कांदा भेट दिली.
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या इचलकरंजीतील निवासस्थानी जाऊन त्यांना खर्डा-भाकरी खाऊ घातली. तसेच काही कार्यकर्ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर ऊस दर आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.