
Solapur News : टंचाई उपाययोजनेबाबत फेरतपासणी करून आराखडा सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता यांना दिले आहेत.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वर्ष २०२४-२५ साठी २२ कोटी ५ लाख ७१ हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यातून ६२४ गावे आणि १८८५ वाड्यांना ४३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.
त्याचा अंदाजित खर्च १६ कोटी ५५ लाख ५२ हजारांचा आहे. दरम्यान, २०२३ - २४ च्या आराखड्यात ६२६ गावे व १८९१ वाड्यांना १ हजार २४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा प्रस्तावित होते. परंतु प्रत्यक्षात २१४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच २०२४ मध्ये जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला आहे.
तर सध्या जिल्ह्यातील बहुतांश गावात जलजीवन मिशनमधून नळ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे २०२४-२५ च्या आराखड्यात टँकरची संख्या लक्षणीरित्या कमी होणे अपेक्षित होते.
त्याचबरोबर उपविभागांनी सादर केलेल्या २०२४-२५ साठी आराखड्यात आणि २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष पाणीपुरवठा केलेल्या टँकर संख्येच्या तुलनेत तफावत असल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी टंचाई उपाययोजनेबाबत फेरतपासणी करून आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.