

Akola News : बाळापूर महसूल विभागातील काही गावात असणारे शेतकऱ्यांचे शेत रस्त्याबाबतचे वाद नायब तहसीलदार सै. ऐहसानोद्दिन यांच्या पुढाकाराने मिटविण्यात यश आले आहेत. झुरळ खुर्द, उरळ खुर्द गावाला लागलेले रस्त्याचे ग्रहण तसेच खिरपुरी बुद्रुक, वाडेगाव येथील अनेक वर्षांपासून शेत रस्त्याबाबत असलेला वाद प्रशासनाच्या पुढाकाराने मिटविण्यात आला.
याबद्दल जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शेतकऱ्यांचे कौतुक करीत त्यांचा सत्कार केला. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव भाग क्रमांक तीनमधील ‘मामोजी वाट’ या रस्त्यावरील दोन शेतकऱ्यांच्या बांधावर असलेल्या झाडांच्या फांद्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण व्हायचा.
इतर शेतकऱ्यांना या दोन्ही शेतकऱ्यांनी रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे नायब तहसीलदार सैय्यद ऐहसानोद्दीन यांच्या कोर्टात प्रकरण दाखल करण्यात आले.
नायब तहसीलदारांनी यांनी रस्त्याचे स्थळ निरीक्षण करीत दोन्ही शेतकऱ्यांना सदर रस्ता मोकळा करण्याबाबत, त्या रस्त्यावरून जाणाऱ्या उपस्थित असलेले सर्व शेतकऱ्यांची सभा घेतली. त्यांना समजावून सांगत आपसात प्रकरण मिटविण्याचा सल्ला दिला. दोन्ही शेतकऱ्यांनी केलेल्या रस्त्याचा अडथळा शेतकऱ्यांनी स्वतः दूर केला.
सत्कारावेळी नायब तहसीलदार ऐहसानोद्दीन, मंडळ अधिकारी सी. सी. बोळे, तलाठी राम लंगोटे, लोपमुद्रा कोठुळे, नारायण घाटोळ, शेतकरी मनोहर राहणे, गजानन मानकर, शिवलाल लोखंडे, विनोद मानकर, सुनील मानकर, रामराव मानकर, दत्तात्रय मानकर आदी शेतकरी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.