Nashik News : शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यापूर्वी म्हणून पणन महामंडळाकडून कांदा चाळीसाठी जे अनुदान दिले जात असे ते बंद करण्याचा नुकताच निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कांदा अनुदान पूर्ववत सुरू करावे अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा साठवणूक करून त्याची जी निगराणी करावी लागते. त्यासाठीही कांदा चाळी उभारण्यासाठी अनुदान देण्याची योजना आखली. शेतकरी अनुदानात अजून पैसे टाकून कांदा चाळी उभारत असतो.
मध्यंतरीच्या काळात मागील त्याला कांदा चाळ हा निर्णय लागू करण्यात आला व आता पुन्हा कांदा चाळ अनुदान बंद करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शेतकऱ्यांना शेतीमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडवणूक होत असल्याची भावना आहे.
त्यात आता कांदा चाळीचे अनुदान बंद झाल्याने नाराजीत वाढ झाली आहे. या निर्णयाविरोधात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकार विरोधी प्रतिक्रिया आहे. शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांनी याप्रश्नी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.