
Jalgaon News : चाळीसगावनजीकच्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातील साठा ९२ टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर विसर्ग सुरूच आहे. गिरणातून बुधवारी (ता. २८) दुपारी १२६८ क्सुसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. बुधवारी विसर्ग सुरूच होता. धरणाचे पाणी नदीत न सोडता नदीजोड प्रकल्पाद्वारे पारोळा तालुक्यातील भोकरबारी व म्हसवे येथील लघू प्रकल्प आणि एरंडोलातील अंजनी प्रकल्पात सोडण्यात आले होते.
गुरुवारीदेखील (ता. २९) धरणाचे पाणी या प्रकल्पांत सोडण्यात आले. गुरुवारी दुपारी धरणातील विसर्ग वाढविण्यात आला. सहा दरवाजांतून हा विसर्ग सुरू होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस मागील आठवड्यात झाला होता. यामुळे धरणात पाण्याची आवक कायम होती.
गुरुवारी ही आवक काहीशी वाढली. यामुळे विसर्गदेखील वाढविण्यात आला. धरणाची साठवणक्षमता १८ टीएमसी असून, या धरणावर गिरणा पट्ट्यातील पाच तालुक्यांसह अनेक गावे, शहरांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.
धरणात पाण्याचा प्रवाह वाढेल, तसा प्रवाह कमी-अधिक केला जाणार आहे. धरणातील पाण्यामुळे अंजनीसह भोकरबारी, म्हसवे तलावातील साठा वाढला आहे. हे प्रकल्प आवर्षणप्रवण भागात असल्याने धरणातून पाणी सोडले जात आहे.
गिरणा नदीतील प्रवाह घटला
गिरणा नदीला मागील आठवड्यातील पावसाने बऱ्यापैकी प्रवाही पाणी आले होते. परंतु चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल या भागांतील पाऊस ओसरल्याने गिरणा नदीतील प्रवाही पाणी कमी झाले आहे. नदीत अल्प प्रवाह गुरुवारी होता. शुक्रवारी (ता. ३०) हा प्रवाह आणखी कमी झाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.