Water Scarcity : पावसाळ्यात टंचाईच्या झळा

Water Crisis : जून महिन्याच्या मध्यंतरात पावसाळा सुरू झालेला असतानासुद्धा जिल्ह्यातील पाणीटंचाईचे ग्रहण सुटता सुटेना, अशी परिस्थिती आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : जून महिन्याच्या मध्यंतरात पावसाळा सुरू झालेला असतानासुद्धा जिल्ह्यातील पाणीटंचाईचे ग्रहण सुटता सुटेना, अशी परिस्थिती आहे. आजही ११ गावांना २० टॅंकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ११० गावांमध्ये ८५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून तेथील नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. त्यामुळे आता सर्वांनाच समाधानकारक पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

Water Scarcity
Water Crisis : पावसाळ्यात जलसंकट

यंदा जूनमध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पाऊस पडतो तर काही भाग कोरडाच आहे. त्यातच उष्णतेची तीव्रताही वाढली आहे. जून महिन्याचे २२ दिवस उलटूनसुद्धा मुसळधार पाऊस न झाल्याने टंचाईची परिस्थिती कायम आहे.

Water Scarcity
Water Crisis : नऊ तालुक्यांतील ५६ गावांतील ६६ विहिरींचे अधिग्रहण

मे मध्ये सुरू झालेले टॅंकर्स आजही सुरूच असून विहिरींच्या अधिग्रहणाची संख्यासुद्धा वाढलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे यंदा एप्रिल महिन्यातच टंचाईग्रस्त गावांना टॅंकर सुरू करण्यात आले आहेत.

अद्याप समाधानकारक पावसाळा न झाल्याने ग्रामीण भागात टंचाई आहेच. हळूहळू तीची तीव्रता कमी होत आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानंतर टॅंकर बंद करण्यात येतील.
- सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com