
Kharif Season In Amravati : यंदाच्या खरीप हंगामात बियाणे बाजार एक जूननंतर सुरू होणार असून, या बाजारात बोगस व नकली बियाण्यांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे.
शेतकऱ्यांची बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाचे लक्ष्यांक निश्चित झाले आहे. १५ भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, तेवढीच तक्रार नियंत्रण कक्ष उभारण्यात आली आहेत.
खरीप हंगाम कृषी निविष्ठा गुणनियंत्रण नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी पंधरा भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत. निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष व तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आल्या आहेत.
कापूस बियाण्यांसाठी एक जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती आहे. या पथकांचे काम सुरू झाले असून ३० मे पर्यंत कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी व उपलब्धतता तपासण्यात येणार आहे. २५ मे रोजी नमूने काढण्यात येणार आहेत.
यावर्षी बियाण्यांचे १४४०, खतांचे ७७६ व कीटकनाशकांचे २६३ अशा एकूण २४७९ कृषी निविष्ठांच्या नमुन्याचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहे. गतवर्षी या विभागाने २१ परवाने निलंबित केले आहेत. गतवर्षीच्या हंगामात बियाण्यांचे १५१८ लक्ष्यांक ठरविण्यात आले होते.
त्यापैकी १३३७ नमुने काढण्यात आले होते. त्यातील ९४ प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून एका प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. चार विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले.
खतांचे १० व कीटकनाशकांचे ७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यावर्षी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.