Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon

Agriculture Irrigation : नीरा उजव्या कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी

Nira Canal Irrigation : नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी हंगामाचे आवर्तन चालू असताना अचानकपणे शनिवारी (ता.११) आवर्तन बंद करण्यात आले.

Pune News : नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी हंगामाचे आवर्तन चालू असताना अचानकपणे शनिवारी (ता.११) आवर्तन बंद करण्यात आले. यामुळे फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यांतील लाभधारक शेतकऱ्यांचे सिंचन अपूर्ण राहिल्याने शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झालेला आहे. उन्हाळ्याचे दिवस असून पाणीटंचाई तीव्र प्रमाणात जाणवत आहे.

पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नीरा उजवा कालव्याचे राहिलेले आवर्तन पुन्हा चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुण्यातील सिंचन भवन येथे सांगोला, पंढरपूर, माळशिरस, पंढरपूर, फलटण तालुक्यांतील शिष्टमंडळाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना नुकतेच निवेदन दिले.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : ‘शेतकरी, पाणीवापर संस्थांनी रविवारपर्यंत अर्ज करावेत’

त्या वेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण, धैर्यशील मोहिते- पाटील, उत्तमराव जानकर, डॉ. बाबासाहेब देशमुख, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे, पांडुरंग वाघमोडे, माणिक वाघमोडे, दादाराजे घाडगे, माऊली पाटील, दत्तात्रेय टापरे, सोमनाथ पिसे, रावसाहेब पांढरे, संतोष वाघमोडे, किरण पवार, राजेंद्र गायकवाड, सुरेश बर्गे, वसंतराव अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : ‘चासकमान’चे आवर्तन सुटले

नीरा उजवा कालवा सल्लागार समितीच्या उन्हाळा हंगामाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेला पाणी कोटा लाभधारक शेतकऱ्यांना पूर्ण मिळालेला नाही. तसेच २० मे पर्यंत कालवा चालू ठेवण्याचे धोरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरले होते. त्यापूर्वीच सिंचन आवर्तन बंद करण्यात आले.

त्यामुळे शेतकऱ्यांचे हक्काचे १.२५. टीएमसी पाणी शिल्लक असताना लाभधारक शेतकऱ्यांना हे पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. त्या नुकसानीस जलसंपदा विभाग पूर्णपणे जबाबदार राहील, असे त्या वेळी संचालकांना सांगितले होते.

हक्काचा शिल्लक पाणी कोटा अंदाजे १.२५ टीएमसी व पालखीसाठी राखीव ठेवण्यात आलेले ०.८५ टीएमसी पाणी सोडून नीरा उजवा कालव्याचे राहिलेले आवर्तन पुन्हा सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com