Kharif Sowing : खानदेशात धूळपेरणी अल्प

Kharif Season 2025 : कापूस, तुरीची धूळपेऱणी मात्र कोरडवाहू शेतकरी करीत आहेत. कारण कापूस व तूर बियाणे मुबलक आहे. त्यावर पाऊस काही दिवस विलंबाने आल्यास फारसे बियाणे खराब होत नाही, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
Kharif Sowing 2025
Kharif Sowing 2025Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात यंदाही धूळ पेरणी अल्प आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेतरस्ते पाऊस आल्यानंतर खराब होतात व ज्यांच्याकडे बैलजोडी व अन्य यंत्रणा उपलब्ध नाहीत, असेच शेतकरी सध्या कापूस, तूर पिकांची धूळ पेरणी करीत आहेत.

तेलबिया, उडीद, मुगाची धूळपेरणी मात्र शेतकरी टाळत आहेत. कारण तेलबिया वाणावर टोकण किंवा पेरणीनंतर काही दिवसात पाऊस न आल्यास किडी हे बियाणे फस्त करतात. तसेच उडीद, मूग बियाणे महाग आहे. यामुळे उडीद व मुगाची धूळपेऱणीही यंदा शेतकरी टाळत आहेत.

Kharif Sowing 2025
Kharif Sowing : शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या कधी कराव्यात?

कापूस, तुरीची धूळपेऱणी मात्र कोरडवाहू शेतकरी करीत आहेत. कारण कापूस व तूर बियाणे मुबलक आहे. त्यावर पाऊस काही दिवस विलंबाने आल्यास फारसे बियाणे खराब होत नाही, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पाऊस आल्यास अनेक भागात किंवा गिरणा, तापी, अनेर, पांझरा अन्य नद्यांच्या क्षेत्रातील काळ्या कसदार जमिनीत शेतरस्ते खराब होतात. तसेच काळ्या कसदार जमिनीत अधिक पाऊस आल्यास लागवडीला वाफसा व वेळ मिळणेही अनेकदा कठीण होते.

दुसरीकडे ज्यांच्याकडे बैलजोडी नाही, त्या शेतकऱ्यांना पाऊस आल्यानंतर लागलीच सऱ्या तयार करणे व अन्य पेरणीच्या कामांसाठी बैलजोडी भाडेतत्त्वावर वेळेत मिळत नाही. वाफसा नसल्यास लहान यंत्रणेनेदेखील पेरणीसंबंधीचे काम करता येत नाही. यामुळे शेतकरी तूर, कापूस लागवड करून घेत आहेत. परंतु यंदा हे धूळपेरणीचे प्रमाणही अल्प आहे.

Kharif Sowing 2025
Kharif Sowing : पाऊस होऊनही पेरणीसाठी शेतकऱ्यांची सावध भूमिका

खानदेशात यंदा वेळेत व चांगला पाऊस येईल, असेही काही संस्थांनी म्हटले आहे. यामुळे शेतकरी चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचे नियोजन करीत आहेत. दुसरीकडे कृषी विभागानेदेखील पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.

किमान ४० ते ६० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असेही आवाहन केले जात आहे. कारण कमी पावसात लागलीच पेरणी केल्यास आणि पुढे पावसाने काही दिवस उघडीप दिल्यास पेरणी वाया जाण्याची भीती असते.

काही भागात धूळपेरणी

खानदेशात सध्या धरणगाव, अमळनेर, पारोळा, धुळ्यातील शिंदखेडा आदी भागात धूळपेरणी केली आहे. पण पाऊस कमी येत आहे. चांगला ओलावा जमिनीत नाही. यामुळे या धूळपेरणीचे नुकसान होवू शकते, अशीही स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com