Marathwada Water Crisis : पाणीसाठे वाढवीत आहेत चिंता; ३६ लघू, मध्यम प्रकल्प कोरडे

Water Shortage : मराठवाड्यातील प्रकल्पांमधील घटती पाणीसाठ्याची स्थिती चिंता वाढविणारी आहे. जवळपास ३६ लघू-मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून २७४ लघू मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील प्रकल्पांमधील घटती पाणीसाठ्याची स्थिती चिंता वाढविणारी आहे. जवळपास ३६ लघू-मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून २७४ लघू मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी माजलगाव प्रकल्पात केवळ ९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर बनण्याची स्थिती आहे.

मराठवाड्यातील एकूण ७५ माध्यम प्रकल्पांपैकी बीडमधील एका प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे १९ मध्यम प्रकल्पामधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर व जालनातील प्रत्येकी २, बीडमधील ५, लातूरमधील ३, धाराशिवमधील ६ व नांदेडमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. जवळपास २१ मध्यम प्रकल्पात २५ टक्के पेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर केवळ १४ मध्यम प्रकल्पात ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे .

Water Crisis
Water Crisis : सांगली, सातारा जिल्ह्याला पाणी कपातीचा फटका

एकूण ७५० लघू प्रकल्पांपैकी ३५ लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये धाराशिवमधील सर्वाधिक १७, लातूरमधील ३, बीडमधील ६ व छत्रपती संभाजीनगरमधील ९ प्रकल्पांचा समावेश आहे. जवळपास २५५ लघू प्रकल्पातील पाणीसाठा जो त्याखाली गेला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २४, जालन्यातील ४०, बीडमधील ५५, लातूरमधील ३०, धाराशिवमधील ९७, परभणीतील ८ व नांदेडमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

जवळपास १९१ लघू प्रकल्पात २५ टक्के पेक्षा कमी पाणी असून केवळ १६२ लघू प्रकल्पात ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मोठ्या ११ प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर केवळ तीन प्रकल्पात ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी निम्न तेरणा प्रकल्पात २२ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात २६ टक्के, मांजरा प्रकल्पात २८ टक्के इतका कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

Water Crisis
Water Crisis : ‘जायकवाडी’साठी पाणी सोडल्यास जलसमाधी

जायकवाडीत केवळ ४६ टक्के उपायुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या प्रकल्पात नाशिक, भागातील प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत सोमवारी दुपारपर्यंत निर्णय झाला नव्हता. अर्थात या निर्णयावर जायकवाडीतून सिंचनासाठी पाणी मिळेल का हे अवलंबून असेल. मराठवाडा पाणी परिषद या प्रश्नासाठी सातत्याने गोदावरी महामंडळाकडे पाठपुरावा करते आहे.

उपयुक्त पाणीसाठा ४५ टक्क्यांवर

मराठवाड्यातील सर्व ८७७ लघू मध्यम मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमधील पाणीसाठा ४५.९६ टक्क्यांवर आला आहे. यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पात असलेल्या ५२ टक्के पाणीसाठासह मध्यम ७५ प्रकल्पातील ३० टक्के, लघू ७४९ प्रकल्पातील ३१ टक्के, तर गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील ४६ टक्के व तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील ७२ टक्के पाणीसाठ्याचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com