Water Level News : उजनी धरण शंभर टक्के भरूनही पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बँकाचे लाखो रुपयांचे कर्ज काढून दहा किलोमीटरहून अधिक लांबीच्या पाइप लाईन शेतकऱ्यांनी केल्या आहेत. परंतु पाणी पातळी खालावल्याने पाइप, केबल, स्टार्टर, विद्युतपंप आदी उपकरणे वाढवण्यासाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे.
धरण शंभर टक्के भरूनही मेच्या पहिल्या आठवड्यात शून्य टक्के पर्यंत पाणी पातळी खालावली आहे. म्हणजेच धरण पाणीपातळी उणेमध्ये गेली आहे प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे ही वेळ आली आहे, अशा प्रतिक्रियाही शेतकऱ्यांमधून येत आहेत.
जून महिन्यात पावसाने ओढ दिली, तर येथील मुख्य पीक असलेल्या उसासह लाखो रुपये खर्च करून जगवलेल्या फळबागांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.
शेतमालाचे अस्थिर बाजार भाव, खतांचे वाढलेले दर, नापिकी, नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात वेगाने घटणाऱ्या पाणी पातळीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.