Ujani Dam : उजनी धरणात किती राहिलाय पाणीसाठा?

Team Agrowon

किती पाणी संपले?

सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाने तळ गाठला आहे. गेल्या ५५ दिवसांत तब्बल ३३ टीएमसी पाणी संपले आहे.

Ujani Dam | Agrowon

उपसा सिंचन

अडीच महिन्यांपासून कॅनॉल, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडणे सुरुच आहे.

Ujani Dam | Agrowon

उणे पातळी

सततच्या पाण्याच्या उपशामुळे धरणातील पाणी पातळी आता उणे पातळीत पोचली आहे.

Ujani Dam | Agrowon

पाणी साठवणक्षमता

उजनी धरणाची १२० टीएमसी पाणी साठवणक्षमता आहे. पण, सध्या २० ते २२ टीएमसीपर्यंत गाळ आहे. त्यामुळे धरण उणेमध्ये गेल्यानंतर ६४ टीएमसी पाणीसाठा राहतो .

Ujani Dam | Agrowon

किती पाणी वापरले?

२०१८-१९ मध्ये धरणातून उणे पातळीतील २७ ते २८ टीएमसीपर्यंत पाणी वापरले होते. यंदाही तशीच वेळ येईल, असा अंदाज आहे.

Ujani Dam | Agrowon

मृत साठ्यातील किती पाणी वापरावे?

१५ जूनपर्यंत पाऊस झाल्यास मृत साठ्यातील १५ टीएमसीपर्यंत पाणी वापरावे लागेल, अशी स्थिती आहे.

Ujani Dam | Agrowon

उपसा सिंचन

सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ४३३ क्युसेक, बोगद्यातून ५६० क्युसेक व कॅनॉलमधून २२०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे.

Ujani Dam | Agrowon

रोज किती पाणी संपते?

धरणातून रोज पाणी सोडण्यात येत असल्यामुळे अर्धा टीएमसी पाणी संपत आहे. त्यात पुन्हा बाष्पीभवनाचाही फटका बसत आहे. त्यामुळे धरण आता उणेपातळीमध्ये पोचले आहे.

Ujani Dam | Agrowon
Beekeeping | Agrowon