
Aajra News : सुगीची कामे आटोपून शेतकरी रब्बी पिकांकडे वळला आहे. तालुक्यात रब्बीच्या पिकाची लागवड सुरु झाली आहे. शेतकरी नांगरणी करून रब्बी पिकांची पेरणी करू लागला आहे.
तालुक्यात सुमारे ७० हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, आणखी पंचवीस ते तीस हेक्टर क्षेत्रावर रब्बीची लागवड होईल, असे तालुका कृषी विभागातून सांगण्यात आले.
तालुक्यात रब्बी पिकाखालील क्षेत्र पंचवीस वर्षांपूर्वी सुमारे दोन हजार हेक्टर इतके होते. वाटाणा, हरभरा, ज्वारी, मसूर, तूर यासह विविध पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत होती. पण या काही वर्षात रब्बी पिकांचे क्षेत्र घटत चालले आहे.
सध्या दहा टक्क्यांहूनही कमी रब्बीचे पीक क्षेत्र उरले आहे. दुसरीकडे उसाचे क्षेत्र वाढत असून, ते सहा हजार हेक्टरवर पोहोचले आहे. आजरा तालुक्यात वाटाणा, ज्वारी, मसूर व हरभरा पेरणीला सुरवात झाली आहे. सुमारे ७० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.
आणखीन पंचवीस ते तीस हेक्टर क्षेत्रावर लागवड होण्याची शक्यता आहे. अधिकतर रब्बी पिकांची लागवड उत्तूर व पूर्व भागात होत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी अजून सुगीच्या कामातून मोकळा झालेला नाही. पश्चिम भागात शेतकऱ्यांनी गवत कापणीला सुरुवात केली आहे.
औतांची टंचाई
सध्या रब्बीच्या पेरणीसाठी घाई गडबड उडाली असल्याने औत मिळणे शेतकऱ्यांना दुरापास्त झाले आहे. औताची टंचाई तयार झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वावरात कडधान्यांची पेरणी करून ट्रॅक्टरने नांगरणी करून लागवड सुरु केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.