Latest Agriculture News : रब्बी हंगामात पारंपरिक पिकांच्या लागवडीला फाटा देत कमी श्रमात अधिक उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांची लागवड वाढली आहे. पेरणीनंतर तीन महिन्यांनी काढणी केली जाणारे हिरवे खत म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताग (तागडा) लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. तागाचा खत म्हणून वापर न करता बियांच्या विक्रीकडे शेतकऱ्यांचा जोर आहे.
दरवर्षी विक्रीच्या दरात वाढ होत असल्याने ताग लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. पालघर तालुक्यात सुमारे ६० हेक्टर क्षेत्रात तागाची लागवड करण्यात आली आहे. यंदा दोनशे क्विंटल तागाचे उत्पादन अपेक्षित आहे. पालघर तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामात पारंपरिक पद्धतीने तूर, तीळ आणि वालाची लागवड घरगुती वापरासाठी केली जाते.
उत्पन्नाची हमी नसल्याने लागवडीनंतर मशागत आणि खतांचा वापर करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांच्या लागवडीकडे आहे. गेल्या काही वर्षांपासून कमी श्रमात अधिक उत्पादन देणाऱ्या आणि जमिनीची पोषकता वाढवणाऱ्या ताग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
ताग पिकाला हिरवळीचे खत म्हणूनही ओळखले जाते. लागवडीनंतर तागाला बाहेरून नत्र देण्याची गरज भासत नाही. तागाचे रोप नत्राची गरज स्वतः भागवतो. लागवडीनंतर दीड ते दोन फूट उंच झाल्यानंतर उभ्या पिकावर नांगर फिरवून तागाच्या रोपांचा वापर हिरवळीचे खत म्हणून वापर होतो. यंदा पालघर तालुक्यातील ताग लागवडीचे क्षेत्र ६० हेक्टर असून दोनशे क्विंटल तागाचे उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.