
Sangli News: सांगली जिल्ह्यात एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यात झालेल्या अवेळी पावसामुळे ५४ गावांतील ३९२ शेतकऱ्यांच्या २३७ हेक्टरवरील फळपिकांचे आणि बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या संदर्भातील अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील मंगळवार (ता. १) ते रविवार (ता. ६) अशी सहा दिवस वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावली. त्यामुळे तासगाव, कवठेमहांकाळ, वाळवा, पलूस, विटा आणि जत तालुक्यातील बागायती आणि फळ पिकांना फटका बसला आहे. त्याचप्रमाणे कवठेमहांकाळ तालुक्यातील सात शेतकऱ्यांच्या २० टन बेदाण्याचे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाने तातडीने या सहा तालुक्यांतील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून पिकांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून मागवून घेतला. त्यानुसार जिल्हा कृषी कार्यालयाने एकत्रित अहवाल तयार केला आहे.
कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालात २७.६० हेक्टर बागायती तर फळबागांचे २१०.२८ हेक्टर इतके नुकसान झाले असल्याचे नमूद केले आहे. सर्वाधिक नुकसान जत तालुक्यात झाले आहे. जत तालुक्यात १२२.८० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे.
या अवेळी पावसाने नजर अंदाजे किती लाखांचे नुकसान झाले आहे, याबाबत लवकरच माहिती स्पष्ट होईल. त्यादृष्टीने कृषी विभागाच्या स्तरावर काम सुरू आहे. कृषी विभागाने नुकसान झालेल्या पिकांचा केलेला अहवाल वरिष्ठ विभागाकडे सादर केला आहे. वरिष्ठ पातळीवर अहवालाची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच पंचनाम्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.