Pune News : पावसाचे अडीच महिने उलटले तरी पुरेसा पाऊस न पडलेला नाही. त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. पावसाअभावी पुणे विभागातील जवळपास दहा लाख हेक्टर क्षेत्र संकटात सापडले आहे. सध्या अनेक ठिकाणी पिके आता सुकत असून अखेरची घटका मोजत आहेत. तर काही ठिकाणी खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे.
जुलैच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे पेरणीचा टक्का वाढला आहे. पुणे विभागात खरिपाचे सरासरी दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी अकरा लाख ४९ हजार १३५ हेक्टर म्हणजेच १०८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात पेरणी कमी असली तरी सोलापूर, नगर जिल्ह्यांत पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु एकंदरीत पावसाचे प्रमाण हे पुणे आणि नगर जिल्ह्याचा अकोले तालुका वगळता उर्वरित भागात पावसाचे कमी राहिले आहे. त्यामुळे जवळपास दहा लाख हेक्टरवरील पिकांची वाढ खुंटली आहे.
जुलैमध्ये पावसाने काही ठिकाणी दमदार हजेरी लावली. त्यामुळे भाताच्या जवळपास ७४ हजार ७८० हेक्टरवर लागवडी झाल्या असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ऑगस्टमध्ये पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, नगर, सोलापूर जिल्ह्यांत पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने पावसाची फारशी नोंद झालेली नसून आता महिना संपत आला आहे. आता पाऊस नसल्याने पिके सुकत असल्याचे चित्र आहे.सध्या पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात अनेक ठिकाणी तुरळक सरी बरसत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.