Crop Insurance : सव्वा लाख शेतकऱ्यांना विम्याची नुकसानभरपाई

Crop Insurance Compensation : खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडणे, अतिपाऊस अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon

Pune News : खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडणे, अतिपाऊस अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खरीप विमा योजनेत सहभागी झालेल्या दोन लाख २८ हजार ४४१ शेतकऱ्यांपैकी एक लाख २५ हजार ६०० शेतकऱ्यांना ४२ कोटी १३ लाख ९ हजार रुपयांची नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे. अजूनही एक लाख २ हजार ८४१ शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतील सहभागासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत होती. त्यानंतर मुदत वाढ करून ती ३ ॲगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती.

Crop Insurance
Banana Crop Insurance : केळी विम्याचे ३८५६ प्रस्ताव मंजूर

मात्र, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना सुविधा तत्पर न मिळाल्याने व कागदपत्रे मिळवताना आलेल्या अडचणीमुळे पीक विम्यापासून अनेक शेतकरी शेवटच्या दिवसापर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली.

त्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याची स्थिती आहे. तरीसुद्धा पुणे जिल्ह्यातील दोन लाख २८ हजार ४४१ शेतकऱ्यांनी एकूण एक लाख २७ हजार ३३१ हेक्टर क्षेत्राचा पीकविमा काढला होता. यामध्ये सर्वात जास्त शिरूर तालुक्यातील एकूण ३९ हजार ९७६ शेतकऱ्यांनी विमा काढला होता.

जून-जुलै महिन्यात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भुईमूग अशा विविध पिकांसाठी विमा योजना राबविण्यात आली होती. विम्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई मिळणार होती. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

Crop Insurance
Crop Insurance : विमा कंपनीने नाकारल्या ९७ हजार ३९८ पूर्वसूचना

या योजनेची हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३ ऑगस्ट २०२३ होती. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान पीक विम्यासाठी पात्र होते.

तालुकानिहाय शेतकरी संख्या व नुकसानभरपाईचे वाटप (रक्कम लाखांत)

तालुका -- शेतकरी संख्या -- रक्कम

हवेली -- १३९१ -- १९.२०

खेड -- १५,३३५ -- ६,६०.३१

आंबेगाव -- १३,९४४ -- ४,२३.६८

जुन्नर -- २७७९३ -- १३,८५.८८

शिरूर -- २४,५३३ --- ४,९७.२९

पुरंदर -- १३,३०७ -- २,५०.००

दौंड -- २७९२ -- ५४.२६

बारामती -- १९,४३० --- ६,६९.५०

इंदापूर -- ७०७५ -- २,५३.७८

एकूण -- १,२५,६०० -- ४२,१३.९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com