Crop Insurance : पीकविमा परताव्यासह नुकसान भरपाईही रखडली

Crop Damage Compensation : नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा फटका सात लाख शेतकऱ्यांना बसला होता.
Crops Damage in Tripura
Crops DamageAgrowon
Published on
Updated on

Nanded News : खरीप हंगाम २०२४ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला २५ टक्के अग्रिम विमा परतावा, नुकसानीबाबत दावे दाखल केलेल्या विमाधारकांसह बाधितांना शासनाने मंजूर केलेली ८१२ कोटींची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. विमा कंपनीकडे केंद्राचा विमा हप्ता रखडला आहे.

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा फटका सात लाख शेतकऱ्यांना बसला होता. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात नुकसान झाले होते.

यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, यासाठी २५ टक्के अग्रिम विमा परतावा मिळावा, यासाठी अधिसूचना लागू केली. तर विभा भरलेल्या नुकसानग्रस्तांनी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक दावे दाखल केल्यामुळे विमा कंपनीने सॅम्पल सर्वेच्या आधारे परतावा देण्याचे धोरण लागू केले.

दरम्यान शेतकऱ्यांना दोन्ही घटकातर्गत परतावा मिळेल, असे सांगितले जात आहे. परंतु यासाठी केंद्र शासनाचा विमा हप्ता मिळाला नसल्यामुळे विमा परतावा रखडल्याचे बोलले जात आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील अकरा लाख २४ हजार शेतकऱ्यांनी विमा भरला होता.

या शेतकऱ्यांनी एक रुपये प्रमाणे ११ लाख २४ हजार विमा हप्ता भरला तर राज्य शासनाचा ३९५ कोटी व केंद्र सरकारचा ३०३ कोटी असा एकूण ६९९ कोटी रुपये विमा हप्ता कंपनीकडे जमा होणार आहे.

Crops Damage in Tripura
Crop Damage Compensation : पीक नुकसान भरपाई अनुदानाची अनेक गावांना प्रतीक्षा

यातील राज्य शासनाने पहिला हप्ता कंपनीकडे जमा केला. परंतु केंद्र सरकारने हप्त्याचे पैसे दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांना विमा परतावा मिळत नसल्याचे सूत्राने सांगितले. यासोबतच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सात लाख ८३ हजार शेतकऱ्यांना भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ८१२ कोटींची मागणी राज्य शासनाकडे केली होती.

Crops Damage in Tripura
Crop Insurance : उत्पन्नाधारित पीक भाव संरक्षण विमा योजनेसाठी अभ्यास गट

हा निधीही शासनाने मंजूर केला. यातील सहा कोटी भरपाई निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड करण्यात आला. यानंतर शेतकऱ्यांनी व्हीके नंबरद्वारे त्याचे सत्यापन (केवासी) देखील केले. परंतु अद्याप एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईचा निधी मिळाला नाही. शासनाने निवडणुकीपूर्वी घोषित केलेल्या लाडकी बहिण योजनेमुळे सर्वच योजनेला कात्री लागल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

खरिपातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर भरपाईसाठी आम्ही दावे दाखल केले. परंतु अद्याप पीक विमा मिळाला नाही. शासनाकडून भरपाईसाठी पंचनामे झाले, यातूनही आम्हाला एक रुपयाही मिळाला नाही.
- नारायण घोरबांड, शेतकरी, कलंबर, ता. लोहा, जि. नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com