Unseasonal Rain : मराठवाड्यात फळे, पिकांवर अवकाळीचा पुन्हा आघात

Crop Damage : मराठवाड्यात अवकाळीचा जोर थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे.
Crop Damage
Crop DamageAgrwoon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात अवकाळीचा जोर थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. शनिवारी (ता. २०) छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, बीड आदी जिल्ह्यांत अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने पुन्हा एकदा पिके, फळबांगावर मोठा आघात केला.

नऊ एप्रिलपासून मराठवाड्यातल्या विविध भागांत अवकाळी पाऊस, वादळ वारे, गारपिटीचा जोर कमी-अधिक प्रमाणात कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे फळ पिकांसह काढणी बाकी असलेल्या रब्बी पिकांचे व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खास करून आंब्याला या नैसर्गिक आपत्तीचा मोठा दणका बसला आहे.

Crop Damage
Unseasonal rain : राज्याला चांदा ते बांदा अवकाळीने झोडपले; शेतकरी हवालदील

रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मराठवाड्यात पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कायगाव, फुलंब्री, आडुळ, विहामांडवा, चित्तेपिंपळगाव वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सगळीकडचा वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळात उडालेले टीनपत्रा लागून एक मुलगा गंभीर जखमी झाला.

जालना जिल्ह्यातील मंठा शहरासह तालुक्यात काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. भाकरवाडी, घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, सुखापुरी आदी पैकी काही ठिकाणी वादळी वारे तर काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यांतर्गतच्या नळेगाव येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला.

Crop Damage
Unseasonal Rain : पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू बागांवर संकट

सार्थक संतोष ढोले (वय २१) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामध्ये पाच जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. बेलकुंड येथेही पाऊस झाला. उजनी, कासार शिरशी तसेच औसा शहरात वादळी पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर व तालुक्यात वादळ वाऱ्याने आंब्यांचे मोठे नुकसान झाले. पाच दिवसांपूर्वी सलग तीन दिवस परिसरात वादळ वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यानंतर पुन्हा निसर्गाने घास हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला.

वादळी वाऱ्यामुळे पैठण तालुक्यातील चांगतपुरी शिवारातील हरिचंद्र दत्तू नाटकर यांच्या शेतात १०० आंब्यांची झाडे आहेत. वादळी वाऱ्यामुळे मोठी फळ गळती झाली. त्यांचे अंदाजे १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

अतोनात मेहनत करून मी ही फळबाग गेल्या अनेक वर्षांपासून सांभाळतो. उदरनिर्वाह फळबागेवर आहे. माझ्या परिवारावर आर्थिक संकट कोसळले आहे. ७० टक्के नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.
- हरिचंद्र दत्तू नाटकर, नुकसानग्रस्त शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com