
Ahilyanagar News : अहिल्यानगर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनात सरसकट शेतकरी कर्जमाफीचा ठराव करण्यात आला. या वेळी भाजप आणि सरकारवर नेत्यांनी जोरदार टीका केली.
पक्षाचे जिल्हा अधिवेशन शनिवारी (ता. १४) झाले. राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे अध्यक्षस्थानी होते. राज्य सहसचिव डॉ. राम बाहेती, भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष प्रा. स्मिता पानसरे, अप्पासाहेब वाबळे, बाबा आरगडे, बबनराव सालके, जिल्हा सचिव ॲड. बन्सी सातपुते, यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी सहभागी झाले होते.
या अधिवेशनात विविध ठराव करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या, नवीन कामगार संहिता रद्द करा, शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी कायदा करा, अल्पसंख्याक समाजावर उघडपणे सुरू असलेल्या दहशतीला पायबंद घाला, मॉबलिंचिंगच्या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, या मागण्यांसंदर्भात ठराव घेण्यात आले.
सत्ताधारी स्वतःचे हित साधण्यासाठी जाती, धर्मावरून झुंजविण्याचे काम करत आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासन पूर्ण करण्याऐवजी जाती-धर्माचे मुद्दे उपस्थित करून प्रमुख प्रश्नांना बगल दिली जात आहे.
जन सुरक्षा विधेयक हे अर्बन नक्षलच्या नावाखाली चळवळी दडपण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप अॅड. लांडे यांनी केला. तर भाजप हे भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबवत आहे. सरकारी शाळा बंद करून खासगी भांडवलदारांच्या शाळांना अनुकूल धोरण राबविले जात आहे.
माणसे एकत्र राहून सत्तेविरोधात बंड करू नये, यासाठी सत्ताधारी जाती-धर्माच्या भिंती निर्माण करत आहे. मात्र श्रमिक, माणसाला माणूस म्हणून जोडणारा पूल बांधण्याचे काम कम्युनिस्ट करत असल्याचे राम बाहेती म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.