CM Shinde : लोकसभेत निवडणुकीत कापूस, सोयाबीन आणि कांद्याने फटका दिला: मुख्यमंत्री शिंदेंनी दिली कबुली

Chief Minister Eknath Shinde : देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात म्हणावे तसे यश महायुतीला मिळाले नाही. महायुतीच्या अनेक उमेदवारांना कापूस, सोयाबीन आणि कांद्यासह मराठा आरक्षणाचा फटाक बसला.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeAgrowon

Pune News : विदर्भासह मराठवाड्यात महायुतीला कांद्यासह कापूस, सोयाबीनने रडवले अशी स्पष्ट कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते मंगळवारी (ता.११) शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत बोलत होते. ही बैठक सह्याद्री बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप सत्तेत आहे. यादरम्यान लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुती भक्कम असतानाही हवे तसे यश मिळाले नाही. यावरून आता महायुतीतील पक्ष विचारमंथन करत आहेत. तर कोणत्या मतदारसंघात पराभवासाठी कोणते कारण कारणीभूत ठरले याचे चिंतन केले जात आहे. यादरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी मराठवाड्यासह विदर्भातील महायुतीच्या उमेदवारांच्या पराभवास संविधान बदलाच्या मुद्द्यासह कापूस, सोयाबीन आणि कांद्यांचा प्रश्न असल्याची कबूली दिली आहे.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : अलमट्टीच्या पाण्याबाबत मुख्यमंत्री अॅक्शनमोडवर, ऑनलाईन बैठकीत दिल्या सूचना

लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यात उष्णतेची लाट होती. आता चांगला पाऊस होत आहे. शेतकऱ्यांशी निगडीत आजची बैठक अत्यंत महत्वाची असल्याचे शिंदे म्हणाले. आजच्या बैठकीचा विषय गंभीर असून मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विषय हाताळण्यासाठी नेहमीच पुढे असतो. पण यावर देखील काही लोक टीका करतात. म्हणतात मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात. वेळेची बचत व्हावी यासाठी हेलिकॉप्टर वापरतो असा, टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तहानलेल्या मराठवाड्याचा दौरा फक्त सूचनांपूरता

तसेच बांबूच्या शेतीबाबत महत्वाचा निर्णय सरकारने घेतला असून सरकारने बांबूच्या शेतीसाठी अनुदान देण्याचं ठरवल्याची माहिती शिंदे यांनी दिली. तर तापमान वाढीवर नियंत्रण ठेवायचे असल्यास झाडे लावायला हवीत. पण महाविकास आघाडीच्या काळात सर्व ठप्प होतं अशी टीका शिंदे यांनी केली.

तसेच सोयबीन कापूस आणि कांद्याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचं होतं. त्यासाठी प्रावधान तयार करत सोयाबीन आणि कपाशीसाठी साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने ती देता आली नाही. त्यामुळेच महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे शिंदेंनी मान्य केले. तसेच राज्यातील सोयबीन कापूस आणि कांद्याच्या प्रश्नाबाबद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले आहे. तर आता लवकरच केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेतली जाईल अशीही माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com