
Nanded News : पांढरे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या कापूस पिकाची लागवड विदर्भासह मराठवाड्यात दिवसेंदिवस कमी होत आहे. खरेतर कापूस पीक हे शेतकऱ्यांना श्रीमंतीच्या दिशेने नेणारे नगदी पीक आहे. शेतकऱ्यांसाठी कापूस पीक हे शाप नाही तर वरदान असल्याचे प्रतिपादन कृषितज्ज्ञ दादा लाड यांनी केले.
सगरोळी (ता.बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित तीनदिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बुधवारी (ता.२९) दादा लाड कापूस तंत्रज्ञान या विषयी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. कापूस लागवड ते काढणी यामधील व्यवस्थापन व तंत्रज्ञान हे सांगताना, कपाशीच्या झाडाची शेंडा खोडणी, गळफांद्या व फळफांद्या यातील फरक सांगून गळ फांद्या छाटण्याचे महत्त्व सांगितले.
बोंड संख्या वाढविण्यापेक्षा वजन वाढविण्याचे तंत्रज्ञान व लागवड पद्धतीचा कानमंत्र दिला. यामुळे निश्चितच कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्याची खात्री शेतकऱ्यांना दिली. परभणी येथील शेतकऱ्याने या तंत्रज्ञानाच अवलंब करीत एकरी २४ क्विंटलपर्यंतचे उत्पन्न मिळविले असल्याचे उदाहरण दिले.
जगामध्ये प्रत्येकास कापड हा लागतोच त्यामुळे वस्त्र निर्मितीसाठी कपाशी महत्त्वाचे पीक असल्याने इतर पिकाच्या तुलनेत हे पीक शाश्वत असून मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याने याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे म्हणाले.
कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवाडे यांनी, जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती देताना, प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची माहिती देऊन शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी अंचोली येथील युवा शेतकरी रणजित दत्तात्रेय निकम यांना सेंद्रिय शेतीमधील प्रभावी कामाबद्दल कर्मयोगी बाबासाहेब देशमुख कृषिवेद युवा शेतकरी पुरस्कार २०२५ देण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.