Cotton Farming
Cotton FarmingAgrowon

Cotton Cultivation : कापसाची लागवड २७ लाख हेक्टरवर

Cotton Farming : यंदा पाऊस लवकर सुरू झाला. त्यामुळे जूनमध्येच बहुतांश भागात कापसाच्या लागवडीला वेग आला आहे. आतापर्यंत राज्यात सुमारे २७ लाख ९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.
Published on

Nagar News : यंदा पाऊस लवकर सुरू झाला. त्यामुळे जूनमध्येच बहुतांश भागात कापसाच्या लागवडीला वेग आला आहे. आतापर्यंत राज्यात सुमारे २७ लाख ९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. या महिनाअखेर कापसाची लागवड उरकण्याचा अंदाज आहे. खरिपातील अन्य पिकांच्या पेरण्याही वेगात सुरू आहेत. २४ जूनपर्यंत राज्यात ३०.४७ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

खरिपात साधारणपणे मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी, भात, तूर, मक्याची पेरणी तर कापसाची लागवड करतात. राज्यात खरिपाचे यंदा १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ सरासरी क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक कापसाचे ४२ लाख १ हजार १२८ हेक्टर, तर सोयाबीनचे ४१ लाख ४९ हजार ९१२ हेक्टर क्षेत्र निश्‍चित केले आहे. राज्यातील अनेक भागांत यंदा पावसाने वेळेत सुरुवात केली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा काहीसा लवकर पाऊस आला. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा दिवस लवकर खरिपाच्या पेरण्या आणि कापूस लागवडीला वेग आला.

Cotton Farming
Cotton Farming Technology : कपाशीसाठी दादा लाड तंत्रज्ञान फायदेशीर

आतापर्यंत (२८ जून) सरासरीच्या २७ लाख ९ हजार ४३४ हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. कापसाची धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३६ हजार, नंदुरबारमध्ये ६० हजार हेक्टर, जळगावमध्ये ३ लाख ४० हजार ८४१, नगरमध्ये १ लाख १० हजार हेक्टर, जालन्याला २ लाख ५० हजार, छत्रपती संभाजीनगरला ३ लाख १० हजार हेक्टर, बीडला २ लाख ३३ हजार, परभणीला १ लाख ५३ हजार, नांदेडला १ लाख १७ हजार, बुलडाण्याला ९८ हजार, अकोला ५१ हजार, अमरावती ७६ हजार, यवतमाळ जिल्ह्यात ३ लाख १० हजार, वर्ध्याला दीड लाख हेक्टर, नागपूरला १ लाख १५ हजार, चंद्रपूरला १ लाख ८ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. गेल्या वर्षी २८ जूनपर्यंत केवळ २ लाख ४२ हजार ९४४ हेक्टरवर कापूस लागवड झाली होती.

Cotton Farming
BT Cotton Production: कपाशी लागवडीची नविन पद्धत फायदेशीर

धाराशिव, सोलापुरात सर्वाधिक ८५ टक्के पेरण्या

राज्यात सर्वाधिक धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या ८५ टक्के, लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येकी ८२ टक्के, सोलापूर ८५ टक्के, नगर ७२ टक्के, जालना व बीड सरासरी ७८ टक्के, वाशिमला ७१ टक्के पेरणी झाली आहे. काही भागांत मात्र अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्यांत अडथळे निर्माण होत आहेत. राज्यात आतापर्यंत १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ७७ लाख १९ हजार ७१३ हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

तीस लाख हेक्टरवर सोयाबीन

राज्यात सोयाबीनचे ४१ लाख ४९ हजार ९९२ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा शेतकरी कापसासह सोयाबीनलाही प्राधान्य देत आहेत. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सरासरीच्या ७२ टक्के सोयाबीन पेरले गेले आहे. मक्याची सरासरीच्या ४१ टक्के म्हणजे ८ लाख ८५ हजार ६०८ हेक्टरपैकी ५ लाख ७६ हजार ११९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याची सरासरीचा ६९ टक्के पेरणी झालीय. गेल्या वर्षी आजपर्यंत तुरीची केवळ ७ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा आतापर्यंत ६ लाख ४९ हजार ९०८ हेक्टरवर तूर लागवड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com