
Nandurbar News : शहरासह तालुक्यातील अनेक भागांत मेमध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर आता दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरात खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. जमिनीत पुरेशी ओल असूनही मशागती पूर्ण झाल्या नसल्याने पेरण्या खोळंबल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
तळोदा शहरासह तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसनसह परिसरात गेल्या मे महिन्यात अवकाळी पावसाने अनेकदा हजेरी लावली होती. त्यामुळे शेतीकामे खोळंबली होती. आता मॉन्सूनचा पाऊस रोजच हजेरी लावत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून पाऊस रोजच पडत असून, जमिनीत पुरेशी ओल देखील तयार झाली आहे. मात्र, ओल असल्याने मशागती करण्यास अडचणी येत आहे. वाफही होत नसल्याने पेरण्या लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, मे महिन्यातील पावसामुळे बाजरी, भुईमूग, तीळ काढणी लांबली आहे.
त्यामुळे जमीन लवकर रिकामी न झाल्याने मशागतही बहुतांश ठिकाणी राहिली आहे. या पट्ट्यात बहुतांश शेतकऱ्यांची शेती सततच्या पावसाने पडून राहिली असून, पावसाने उघडीप दिली तरीही पेरणीपूर्व मशागतीची कामे करूनच पेरणी होणार असल्याने पेरणी खोळंबणार आहे.
परिसरातील काही शेतकऱ्यांचा बाजरी, भुईमूगाचा चारा शेतातच मातीमोल झाला आहे. तीळ कापून गरी केली असल्याने तीळही खराब झाली. त्यामुळे कधी एकदा पाऊस उघडीप देतो, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. सध्या परिसरात कपाशी, मिरची लागवड सुरू असून, ज्वारी, मका, सोयाबीन, कडधान्य यांसारख्या पिकांचा पेरा मात्र उशिरा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.