Irrigation Project : सिंचन प्रकल्पांच्या किमतीत सतत वाढ

Agriculture Irrigation : खानदेशात हवी तशी जलसंपदा नसल्याने गिरणा, पांझरा परिसराचा विकास झालेला नाही. अनेक प्रकल्प पूर्ण झाले, पण कालव्यांचा प्रश्‍न राहिला आहे.
Irrigation Project
Irrigation Project Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात हवी तशी जलसंपदा नसल्याने गिरणा, पांझरा परिसराचा विकास झालेला नाही. अनेक प्रकल्प पूर्ण झाले, पण कालव्यांचा प्रश्‍न राहिला आहे. काही प्रकल्प अपूर्णच आहेत. तर अनेक प्रकल्प फक्त चर्चेत आहेत.

गिरणा पट्टा अवर्षणप्रवण आहे. त्यात मागील काही वर्षांत फक्त वरखेड - लोंढे बॅरेजचे काम गिरणा नदीवर चाळीसगावात बऱ्यापैकी झाले. तर तापी नदीवरील शेळगाव बॅरेजचे कामही मार्गी लागल्याची स्थिती आहे. त्यात आता जलसंचयही होणार आहे. किरकोळ भूसंपादन व पुनर्वसन करायचे आहे.

परंतु गिरणा नदीवरील सात बलून बंधारे व तापी नदीवरील अमळनेरातील (जि. जळगाव) पाडळसे निम्न तापी प्रकल्प सतत चर्चेत आहे. तापी नदीवरील मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरी महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पही केव्हा हाती घेतला जाईल, याची प्रतीक्षा आहे.

Irrigation Project
Irrigation Project : पाडळसेसह अनेक सिंचन प्रकल्पाचे भिजत घोंगडे

बलून बंधारे प्रकल्प मागील २० वर्षे चर्चेत आहे. त्यासंबंधी प्रशासकीय स्तरावरील प्रक्रिया मार्गी लागली आहे. निधीची गरज आहे. पाडळसे प्रकल्पासही निधीची गरज आहे. बलून बंधारे प्रकल्पास १५ वर्षांपूर्वी सुमारे ११३० कोटी रुपये निधीची गरज होती. आता या प्रकल्पाची किंमत तीन हजार कोटींवर गेली आहे.

चाळीसगाव, पाचोरा, भडगाव व जळगाव तालुक्यात हे सात बलून बंधारे होणार आहेत. सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्र व किमान १०० गावांना या प्रकल्पांचा मोठा लाभ होणार आहे. तत्कालीन केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी या प्रकल्पाचा समावेश केंद्रीय प्रायोगिक प्रकल्पांत केला होता. मान्यता, प्रशासकीय कार्यवाहीत १० वर्षे गेली. आता हा प्रकल्प हाती घेतला जावा, अशी मागणी येत आहे.

Irrigation Project
Padalse Irrigation Project : निम्न तापी सिंचन प्रकल्प दुर्लक्षितच

पाडळसे निम्न तापी प्रकल्प २८ वर्षे रखडला आहे. त्याचे काम रखडत सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्याची किंमत आहे. साडेचार हजार कोटींवर आहे. शिवाय पुनर्वसन व अन्य कार्यवाही पूर्ण झालेली नाही. या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, धुळ्यातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात होणार आहे. तापीचे पाणी वाहून जाते. त्याचा उपयोगही या प्रकल्पामुळे होईल.

हरिभाऊंचे स्वप्न साकार करा

तत्कालीन आमदार, खासदार तथा भाजप नेते स्व. हरिभाऊ जावळे यांनी तापी नदीवर महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पाची संकल्पना पुढे आणली. मोठा पाठपुरावा केला. त्यांच्या खासदारकीच्या काळात बऱ्यापैकी प्रशासकीय कार्यवाही झाली. पण ते २०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर त्यांचा केंद्राशी संपर्क कमी झाला. नंतर हा प्रकल्प रखडला.

त्यासाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये निधीची गरज आठ वर्षांपूर्वी होती. परंतु आता या प्रकल्पाची किंमतही आठ हजार कोटींवर गेली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल व चोपडा, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर व अन्य भागाला या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. जावळे यांच्या पक्षातील मंडळी आता केंद्र व राज्यातील सत्तेत आहे. हा प्रकल्प या पंचवार्षिकमध्ये मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com