Banana Market : खानदेशात केळी खरेदीत काटामारी; शेतकऱ्यांची लूट

Banana Rate : केळी दर यंदा टिकून आहेत. परंतु केळी खरेदीत मोठी काटामारी सुरू आहे. याकडे प्रशासन, यंत्रणेचे दुर्लक्ष असून, शेतकऱ्यांची सर्रास लूट केली जात आहे. केळी खरेदीत कटती किंवा काटामारीचा प्रकार अनेक वर्षे खानदेशात सुरू आहे.
Banana Market
Banana MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: केळी दर यंदा टिकून आहेत. परंतु केळी खरेदीत मोठी काटामारी सुरू आहे. याकडे प्रशासन, यंत्रणेचे दुर्लक्ष असून, शेतकऱ्यांची सर्रास लूट केली जात आहे. केळी खरेदीत कटती किंवा काटामारीचा प्रकार अनेक वर्षे खानदेशात सुरू आहे.

हा प्रकार थांबत नसल्याने खरेदीदारांचे फावले आहे. कुठेही कारवाई सुरू नसल्याने या प्रकारास चाप केव्हा बसणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. खानदेशात केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जाते.

बाजार समित्यांत कुठलीही आवक केळीची होत नाही. सर्व व्यवहार थेट किंवा शिवार खरेदीत होत असल्याने बाजार समित्यांकडे त्याची नोंद नसते. याचा लाभ खरेदीदार तेजी व मंदीच्या काळात घेतात.

अनेक खरेदीदारांकडे खरेदी परवाना नसतो, बाजार समित्यांकडे त्यांची काहीही नोंद, अनामत नसते. यामुळे उधारीचे व्यवहार करून पुढे शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकारही होत आहेत.

यंदाही याबाबतच्या चार-पाच तक्रारी यावल, रावेर, चोपडा भागांत दाखल झाल्या आहेत. अलीकडेच एका सावदा (ता. रावेर) येथील केळी एजंटच्या तक्रारीनुसार हरियानातील खरेदीदारास फसवणूकप्रकरणी अटक झाली आहे.

क्विंटलमागे तीन किलो कटती एक क्विंटल केळीच्या खरेदीमागे तीन किलो केळी अधिकची खरेदीदार घेतात. या तीन किलो केळीसाठी कोणताही मोबदला खरेदीदार देत नाहीत. तीन किलो सूट, असा प्रकार यास खानदेशात म्हटले जाते.

केळीची वाहतूक व अन्य कार्यवाहीत घट येते, नुकसान येते, हे नुकसान शेतकऱ्यांकडून एक क्विंटल केळीमागे तीन किलो केळी अधिकची घेऊन भरून काढण्याचा प्रकार खरेदीदार सर्रास करीत आहेत. अर्थात १०० क्विंटल केळीची खरेदी खरेदीदाराने केल्यास त्यावर खरेदीदार शेतकऱ्याकडून तीन क्विंटल केळी विना मोबदला घेऊन जात आहे.

Banana Market
Banana Rate : केळी उत्पादकांची लूट सुरुच

सध्या केळीला जागेवर २००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. यानुसार किमान सहा ते नऊ हजार रुपयांची केळी कुठलाही मोबदला न देता १०० क्विंटल केळीने भरलेल्या वाहनातून खरेदीदार मनमानी, चुकीच्या अटी लादून घेऊन जात आहेत.

खानदेशात जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, जळगाव, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा या बाजार समित्यांच्या क्षेत्रात केळीवर कटती, काटामारी लादून खरेदीदार आपला नफा वाढवून घेत आहेत.

या बाजार समित्यांकडून मात्र याबाबत कोणतीही कारवाई केली जात नसल्याची स्थिती आहे. शेतकरी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत, कारण तक्रार दिल्यास व्यापारी लॉबी केळी खरेदी करीत नाही. केळीचा व्यापार खरेदीदारांच्या मनमानीनुसार चालत आहे. यात शेतकऱ्याचेपुढे नाहक नुकसान होते.

घडदंडा वजनाच्या अटीतून लूट

अनेक खरेदार बॉक्समध्ये पॅकिंग करून केळीची थेट खरेदी करतात. या खरेदीदार केळीच्या फण्या घडाच्या दंड्यापासून वेगळ्या कराव्या लागतात. या घडाच्या दंड्याचे फक्त ७०० ग्रॅम वजन खरेदीदार गृहीत धरतात. या दंड्याचे वजन एक ते सव्वा किलो एवढे असते. यामुळेकिमान एक किलो वजन या दंड्याचे गृहीत धरले जावे, अशी मागणी शेतकरी मागील काही वर्षे करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com