
Akola News : शेतीत उत्पादनवाढ आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रयोगशील आणि मेहनती शेतकऱ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशा एकूण ११ खरीप पिकांमध्ये स्पर्धा घेतली जाणार आहे. उडीद, मूग पिकांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येईल. इतर पिकांसाठी ३१ ऑगस्ट ही मुदत आहे.
सर्वसाधारण गटासाठी प्रति पीक ३०० रुपये, तर आदिवासी गटासाठी प्रति पीक दीडशे रुपये शुल्क आहे. स्पर्धेत सहभागासाठी शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची जमीन असावी व ती तो स्वतः कसत असावा.
भात वगळता इतर पिकांसाठी किमान ४० आर (१ एकर) सलग लागवड आवश्यक आहे. एकाच वेळी अनेक पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. ही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून विजेते पुढे जिल्हा व राज्यस्तरावर निवडले जातील. अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळ किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
चलनाची प्रत
सातबारा, नमुना ८ अ उतारा
जात प्रमाणपत्र (आदिवासी गटासाठी)
नकाशा
बँक खाते तपशील (पासबुक/चेक प्रत)
स्पर्धेची बक्षिसे
स्पर्धा पातळी पहिले दुसरे तिसरे
तालुका ५००० ३००० २०००
जिल्हा १०००० ७००० ५०००
राज्य ५०००० ४०००० ३००००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.