
Palghar : डहाणूतील चिकू बागायतदारांना २०२४-२५ च्या खरीप हंगामाची विमा भरपाई मिळालेली नाही. या हंगामात तालुक्यातून १,१०० चिकू बागायतदारांनी विमा कवच घेतले असून, संपूर्ण तालुक्याला १०० टक्के भरपाई मंजूर झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारे अनुदानदेखील विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यापैकी काही अंशी येणे बाकी असल्यामुळे आठवडाभर विलंब होणार आहे, असे विमा कंपनीने स्पष्ट केले.
पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांची होणारी उपेक्षा, त्यांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (ता. २०) शासकीय विश्रामगृहामध्ये आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. चंडिगाव येथील बळवंत राऊत यांनी चिकू बागेची हेक्टरी विमा भरपाई रक्कम ७० हजार ही खूपच कमी आहे. पुढील हंगामापासून ती किमान एक लाख रुपये करावी, असे सुचविले. ते वाढविण्यासाठी आमदार निकोले यांनी सरकारकडे मागणी करण्याचे आश्वासन दिले.
विमा कंपनीच्या खात्यामध्ये शेतकऱ्याने विमा हप्ता जमा झाल्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीचे अधिकारी टाळाटाळ करीत असतात, असे संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी खंत व्यक्त केली.
ॲग्रिस्टॅक, तसेच ई-पीक पाहणीमध्ये गावपातळीवर, पाड्यांवर नोंदणीसाठी खूप अडचणी येत आहेत. त्या तातडीने सोडविण्याची विनंती नीरज प्रदीप पाटील यांनी केली, तसेच सरकारकडून मिळणारी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी विलंब होत असल्याची माहिती आमदारांना दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.