
Dhule News : जिल्ह्यात जिल्हा परिषदेतर्फे विविध गावांतील जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. त्यात सर्वच गावांतील पाण्याच्या नमुन्यांचे संकलन करण्यात आले. आरोग्य विभागाने ही कार्यवाही केली. त्यात एकाही गावातील पाणी दूषित नसल्याचा निर्वाळा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
पावसाळा तोंडावर आहे. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर, असे दोन टप्पे करून सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यात पावसाळ्यापूर्वीची जलस्रोत तपासणी मोहीम पूर्ण झाली आहे.
यात एकाही गावातील पाणी दूषित नसल्याचे तपासणीअंती दिसून आले. १ ते ३० एप्रिल या कालावधीत ही तपासणी मोहीम झाली. जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील दोन हजार ७८७ पाणी नमुन्यांचे संकलन करण्यात आले.
जलजन्य आजारांची समस्या वाढते. पावसाळ्यात अनेकदा ही समस्या अधिक असते. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य खराब होते. या स्थितीत ही तपासणी मोहीम झाली. तपासणीअंती नमुने हे सौम्य जोखीम प्रकारांतील असल्याचे दिसले. यामुळे संबंधित गावांचे पाणी हे पिण्यायोग्य असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.
जलजन्य आजार वेळीच रोखले जावेत यासाठी ही मोहीम पूरक ठरणार आहे. यात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व ग्रामपंचायती समन्वयाने काम करीत आहेत. यामुळे ग्रामस्थांना शुद्ध, सुरक्षित पाणी मिळणार आहे. समस्या असतात त्या ग्रामपंचायतींना रेडकार्ड दिले जाते व जलस्रोत स्वच्छ, पिण्यायोग्य आहेत, त्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.