
Nagpur News : तापमानातील चढउताराचा परिणाम पिकांसोबतच मानवी आणि जनावरांच्या आरोग्यावरही होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच पूरक उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. संत्रापट्ट्यात आंबिया बहरातील फुले तसेच लहान आकाराच्या फळांची गळ होत असल्याने त्या दृष्टीने उपाय केले जात आहे.
राज्यातील दीड लाख हेक्टरपैकी विदर्भात १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. यातील एक लाख हेक्टर क्षेत्र हे अमरावती जिल्ह्यात विस्तारले असून त्या पाठोपाठ २५ हजार हेक्टर लागवड ही नागपूर तर उर्वरित २५ हजार हेक्टर क्षेत्र राज्याच्या इतर भागात आहे. सध्या शेतकऱ्यांद्वारे आंबिया बहाराचे व्यवस्थापन केले जात आहे.
मात्र रात्री तापमानात घट तर दुपारी वाढ होत असल्याने त्याचा फटका बसत उशीराफुट झालेल्या फुल तसेच लहान आकाराच्या फळांची मोठी गळ होत आहे. इतकेच नाही तर पिकावर लाल कोळीचा प्रादुर्भावही वाढीस लागला आहे. बागेची गरज ओळखत पाणी दिले जात आहे, अशी माहिती वाघोली (मोर्शी, अमरावती) येथील संत्रा बागायतदार प्रवीण बेलखेडे यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.