Nandurbar Mirchi Market : शेतकऱ्यांवर सणासुदीला सक्रांत! ३ दिवस बाजार राहणार बंद?

Chilli market : राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्हा ओळखला जातो. येथे यंदा मिरचीचे उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. मात्र पडलेले भाव आणि मिरची वाळवण्यासाठी नसणारी जागा यामुळे जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Nandurbar Mirchi Market
Nandurbar Mirchi MarketAgrowon
Published on
Updated on

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्याची ओळख ही राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून आहे. येथे गेल्या वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाला होता. उचांकी भाव मिळाल्याने जिल्ह्यातील मिरची क्षेत्रात चांगलीच वाढ झाली होती. पण मिरचीचे पडणारे भाव, संक्रांतीमुळे तीन दिवस लिलाव बंद आणि मार्केटमध्ये मिरची वाळवण्यासाठी नसणारी जागा यामुळे शेतकरी चिंतेत असून तो अडचणीत सापडला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. येथे बाजार समितीमध्ये गेल्या वर्षी पेक्षा यंदा मिरचीचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र गेल्या वर्षी पेक्षा यंदा मिरचीला दर म्हणावा तितका चांगला नाही. त्यातच शनिवार, रविवार तसेच सोमवारी संक्रांत असल्याने तीन दिवस लिलाव बंद राहणार आहे. त्यामुळे मिरची शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

खरेदी विक्री बंद

राज्यातील सर्वात मोठी तर देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार पेठ ही नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. येथे मिरचीचे मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. दरम्यान गेल्या आठवड्यात ढगाळ वातवरणामुळे मिरची झाकून ठेवण्यात आली होती.

Nandurbar Mirchi Market
Farmers Producers Company : शेतकरी उत्पादक कंपन्यांना एका छताखाली आणणार

तर नवीन मिरचीची आवक झाली होती. ती वाळवण्यासाठी जागा नसल्यानेही समोर येत आहे. गेल्या आठवड्यात आणि याही आठवड्यात बाजार समितीमध्ये मिरची आवक वाढली असून व्यापारी नाहीत. त्यामुळे काही दिवस बाजार समितीमध्ये खरेदी विक्री बंद होती. अशातच आता बाजार समित्या बंद राहणार असल्याने त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

बुरशीचा धोका

गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा मिरचीचे विक्रमी उत्पादन झाले. गेल्यावर्षीही मिरचीला उचांकी दर नंदुरबारमध्ये मिळाला होता. पण यंदा उत्पादनात वाढ होऊनही दर वाढलेले नाहीत. अशातच गेल्या आठवड्यात आवकाळीच्या भीतीने अनेकांनी मिरची झाकून ठेवली होती. त्यावरही आता बुरशी पडण्याचा धोका वाढला आहे.

Nandurbar Mirchi Market
Chilli in Nandurbar : मिरचीचा 'ठसका'! नंदुरबार बाजार समितीमध्ये विक्रमी आवक; मात्र योग्य किंमतच नाही

...आता आतापर्यंत २ लाख क्विंटल

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बाजार समितीत १ लाख क्विंटल हून अधिक मिरचीची आवक झाली होती. तेव्हा लाल मिरचीला ४ हजारांपासून ते ६००० रुपयांदरम्यान दर मिळला होता. आता यात वाढ झाली असून २ लाख क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. ही आवक मार्च महिन्यापर्यंत अशीच राहणार असून ती ३ लाख क्विंटलपर्यंत जाऊ शकते.

यंदा मात्र खळखळाट

गेल्या वर्षी बाजार समितीत विक्रमी आवक होऊनही मिरचीला चांगला भाव होता. गेल्या वर्षी ४ हजार ते ७ हजारपर्यंत दर मिळत होता. मात्र यंदा मिरचीवरील निर्यात बंदीचा फटका मिरचीच्या दरास बसला आहे. यंदा बाजार समितीमध्ये मिरची दर २ ते ३ हजार रुपायांपर्यंत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com