Chemical Water Panchganga : पंचगंगा नदीला पुन्हा रसायनमिश्रित पाणी; अधिकाऱ्यांना घेराव, हजारो मासे मृत

Chemical Water River : स्वाभिमानी शेतकरी संघटना व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या बंडू पाटील व विश्वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी अधिकारी पाटील यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली.
Chemical Water Panchganga
Chemical Water Panchgangaagrowon
Published on
Updated on

Panchganga River Chemical Water : पंचगंगा नदीला पुन्हा एकदा रसायनमिश्रित काळेकुट्ट प्रदूषित पाणी आले आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत आहेत. या घटनेची प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी बुधवारी सायंकाळी(ता.११) पाहणी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या बंडू पाटील व विश्वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी अधिकारी पाटील यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली.

आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी काहीही उत्तर न देता निघून जाणे पसंत केले. कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका तसेच औद्योगिक वसाहती यांच्याकडून पंचगंगेत प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट सोडण्यात येत असल्याने मासे मृत झाल्याचा आरोप बालिघाटे व पाटील यांनी यावेळी केला. तसेच इचलकरंजी महापालिकेवर कारवाईचा आग्रह धरला.

Chemical Water Panchganga
Warna River Kolhapur : कोल्हापुरात वारणा नदी पात्रात दूषित पाणी; हजारो मृत माशांचा खच, दोन मगरींचा मृत्यू

प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा दिला. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंचगंगा नदीत प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत होण्याचा प्रकार घडला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा रसायनमिश्रित काळेकुट्ट पाणी पंचगंगेत आल्याने हजारो लहान मोठे मासे तडफडून मृत्युमुखी पडले.

प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करा, केवळ पाण्याचे नमुने घेऊन जाऊ नका, तर त्याचा तपासणी अहवाल सार्वजनिक करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. वारंवार अशा प्रकारच्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत असून, याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात मासेमारी करून उपजीविका करणाऱ्या कुरूंदवाड, तेरवाड, शिरढोण परिसरातील बागडी समाज बांधवांनी भाग घेतला.

वारणेनंतर पंचगंगा नदीही प्रदूषित

कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा आणि वारणा या दोन नद्या प्रमुख आहेत. या दोन्हीही नद्यांमध्ये मळीमिश्रीत पाणी सोडल्याने लाखो मासे मृत्यूमूखी पडले तर दोन मगरींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पर्यावरणवादी आणि शेतकऱ्यांकडून आवाज उठवला जात आहे. परंतु एकाही लोकनेत्याने यावर भाष्य केले नसल्याने पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. मागच्या कित्येक वर्षांपासून पंचगंगा प्रदुषणावर आवाज उठवला जात आहे. मात्र नदी आणखी प्रदूषित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com